कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अनुसूचित जातींमध्ये (S.C.)उपवर्गीकरण

गायकवाड वकील

गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने
ऐतिहासिक निकाल दिला.
अनुसूचित जातींमध्ये (S.C.)उपवर्गीकरण करण्याचा
राज्यांना घटनात्मक दृष्ट्या
अधिकार आहे; असा सात
सदस्यीय खंडपीठाने निकाल
दिला. गंमतीचा भाग म्हणजे
दोन दशकांपूर्वी (२००४ साली) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असतांना त्यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने ६ विरूध्द १ अशा बहुमताने दूरगामी निकाल दिला होता.
तोच निर्णय आता घटनापीठाने
फिरवला आहे. हा निर्णय अनाकलनीय, अन्यायी आणि
हास्यास्पद आहे.

कोणताही संबंध नसतांना वर्गीकरणाचा मुद्दा विनाकारण
उपस्थित करत असतांनाच
खंडपीठाने क्रिमी लेअरचा मुद्दा
उकरून काढून आपल्या पुढील
पिढीचे दरवाजे बंद केले आहेत.

लिहीण्यासारखे खूप आहे. पण
न्यायालयातील निकालाच्या संदर्भात टिकाटिपणी करतांना
अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते.
पण न्यायालयाने आपला रामशास्त्री बाणा दाखवला आहे; हे देखील स्पष्टपणे दिसले पाहिजे. पण!!!!

इंग्रजीत एक म्हण आहे …

Ceasar’s wife must be
above suspicion

वरील म्हणीकडे वाच्यार्थाने
बघू नका. यामधील गर्भित
आणि मौल्यवान अर्थ थोडक्यांत
असा आहे..की,..

न्याय सिंहासनावर बसलेल्या न्यायमूर्तीने आपण दिलेल्या न्यायदानामुळे कोणावरही अन्याय होणार नाही; याची काळजी घेणे, अत्यंत आवश्यक आहे.

दुसरी सोपी आणि सुटसुटीत म्हण
आहे….

Justice should not
only be done; but seen to have been done

न्यायदान फक्त करून चालत नाही..तर…न्याय झाला आहे; हे प्रत्यक्षात ठळकपणे दिसून आले पाहिजे.

गुरूवारचा निकाल अतार्किक,
अन्यायकारक, तर्कहीन आणि
दिनदलितांना मुळापासून उखडून
टाकणारी आहे. पण आम्ही
मूकनायक बनलो आहोत.

बंधु भगिनी आणि मातांनो,
लिहीण्यासारखे खूप आहे.
मी अतिशय दु:खी आणि अस्वस्थ
आहे. समाजात एकही नेता..
पुढारी नाही..ज्यांच्या खांद्यावर
मान टाकून भळाभळा रडून
मन मोकळे करता येईल.

चार वर्षांपूर्वी एका सत्र न्यायालयात अट्रासिटी कायद्याच्या अंतर्गत एक
प्रकरण सुरू होते..मी फिर्यादी पीडितांच्या बाजूने वकील म्हणून कामकाज पहात होतो. न्यायाधीश महाशय अतिशय
अयोग्य आणि अन्यायकारक
पणे कामकाज करत होते.
मला ते खटकत होते.चीड येत
होती. शेवटी स्फोट झाला.
फिर्यादी तर्फे माझा लेखी युक्तीवाद रेकॉर्डवर होता. त्या
महिला न्यायाधीशांच्या विरोधात लेखी तक्रार मी प्रधान न्यायधीशांना देवून
आमचे प्रकरण इतर कोणत्याही
न्यायाधीशांकडे सोपविण्याची
विनंती अनेकदा करूनही कारवाई
होत नव्हती. परिणामस्वरूप,
तोंडी युक्तीवादाच्या वेळी त्याचा
स्फोट झाला. माझ्या युक्तीवादाचा
थोडक्यांत उल्लेख खालील प्रमाणे आहे….

मॅडम, तुमच्या विरोधात मी
प्रधान न्यायधीशांकडे अनेकदा लेखी स्वरूपात तक्रार दिल्या आहेत. तुमच्यापुढे मला तोंडी स्वरूपात युक्तीवाद करायची मुळीच इच्छा नाही. कारण आम्हाला तुमच्या कडून न्याय मिळणार नाही. तुम्ही पक्षपाती आहात. माझ्या मनात तुमच्या विरोधात खूप भावना दाटल्या आहेत. पण बोलता येत नाही. कारण मला “लक्ष्मणरेषा” ओलांडायची नाही. ही लक्ष्मणरेषा ओलांडली तर माझ्यावर तुम्ही “कोर्टाची बेअदबी” (Contempt of Court) केली म्हणून कारवाई कराल; यांची मला कल्पना आहे.. कोर्टाची मानमर्यादा ठेवण्याची शिकवण/सुचना माझ्या “बापाने” मला दिल्या आहेत. आणि माझ्या बापाचे नांव आहे,”भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हो.. मॅडम, आपण ज्या न्याय सिंहासनावर आहात..ते सुध्दा माझ्या बापाने लिहीलेल्या संविधानाच्या कृपेचाच आहे..

मायबाप बंधु भगिनींनो,
वरील न्यायालयातील घटना
ही १००टक्के खरी आणि अस्सल
आहे. वरील न्यायाधीशांची नंतर
बदली झाली. त्यांच्या विरोधात मी
उच्च न्यायालयात तक्रार केली होती. सध्या हे प्रकरण उच्च
न्यायालयात आहे… त्यामुळे
काही नावांचा मी उल्लेख केलेला
नाही. कारण न्यायालयांचा मान
सन्मान करणे; हा बाबासाहेबांनी
आम्हाला कानमंत्र दिला आहे.

…..असो!!!!…

दि.१ अॉगस्टची में. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश
चंद्रचूड साहेबांच्या खंडपीठाचा
आदेश पाहिला. आणि मला सत्र
न्यायालयातील माझेच प्रकरण
आठवले. अर्थात, त्यातील भावना
प्रातिनिधीक स्वरूपाच्या असून त्या आजही लागू पडतात. त्यावर
तमाम दलित बौध्द बांधवांनी आणि गांभिर्याने विचार करण्याची
वेळ आलेली आहे.

मनुप्रेरीत चातुर्वर्ण्य येईल; असे
म्हणण्याचा मुर्खपणा करून घरात बसून बायकोच्या पदरात
षंढासारखे लपून बसू नका.
चातुर्वर्णाने गांवाच्या चावडीतून दारात..आणि दारातून घरात शैताना सारखा प्रवेश केला आहे. आम्ही गाफील आहोत. नेते मंडळी लग्नापासून स्मशान ते शौचालयाच्या उद्घाटनात मग्न
आहेत. काही जण विधान सभेच्या तिकीटासाठी त्यांच्या
नेत्यांचे जोडे साफ करण्यात
व्यस्त आहेत. काही पुढारी आपल्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन बीजेपीच्या दादा लोकांना प्रभावित करत आहेत. तर काही जण आपापसात एकमेकांचे कपडे फाडून नागवे करत आहेत.

अतिशय चिड येते. कितीही जिवाचा आटापिटा करा. कितीही
समजावून सांगा. चर्मकार ऐक्य
परिषदेसाठी मुंबईत बैठक घेतली. नेत्यांच्या पाया पडलो.
आणाभाका घेतल्या. निकाल
शुन्य!!! संघटनांना दुहीचा शाप
आहे…अजुनही वेळ गेलेली नाही.

सर्व स्तरांवर आपली कोंडी होत
आहे. वाड्या वस्त्यांत..गांवात
शहरात..नोकरीच्या ठिकाणी..कुठेही जा!!! जातीयवाद आहे. आपल्याला वाली नाही. जिवंतपणी जातीयवाद आहेच!! पण मेल्यानंतर जाळायला स्मशान
मिळत नाही. सध्याच्या पुढा-यांकडून कसली अपेक्षा
करता?? जे स्वतःच तिकीटासाठी
त्यांच्या नेत्यांकडे भीक मागत आहेत..

*गुरूवारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आता
धोक्याचा कंदिल दाखवला आहे.
पुढील प्रवास खडतर आहे.
राज्यातील घराघरातील दलित
चर्मकार बांधव त्वेषाने उठलाच
पाहिजे. नेत्यांच्या नादी लागू नका. यांच्या थोबाडावरच कामाचा लेखाजोखा मागा. लाखों लाखों दलितांमधून चंद्रशेखर..जरांगे
पाटील …जितेंद्र आव्हाड यांच्या
सारखे नेतृत्वच निर्माण करा.
तमाशातील सोंगाड्या किंवा
सर्कीसमधील जोकर पेक्षा सरळ
बंडखोर बना. ठोस भूमिका
घ्यायला शिका.

If you are neutral, in
situation of injustice,
you have chosen side
of the oppressor

एखादा हुकुमशहा अन्याय करीत असतांना तुम्ही तटस्थ राहिलात तर त्याचा अर्थ तुम्ही हुकुमशहाला मदत करत आहात, असा होईल.

जमाना कुछ भी कहे..
उसका एतराम ना कर
जिसे जमीर ना माने
उसे सलाम ना कर

जय भीम

जय रविदास

गायकवाड वकील
९८१९७७०१८९

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!