मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

विजय दिवसानिमित्त देशाची १९७१ च्या युद्धातल्या शहीदांना आदरांजली.

विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत लष्कराच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार या प्रसंगी उपस्थित होते. १९७१ मधे पाकिस्तानवर मिळवलेल्या लष्करी विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ देश शहीद जवानांना अभिवादन करीत आहे.
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या सर्व शहीद जवानांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिवसानिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. जवानांचं शौर्य आणि समर्पण हे देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचं बलिदान लोकांच्या मनात आणि आपल्या देशाच्या इतिहासात कायमचं कोरल जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विजय दिवसानिमित्त सशस्त्र दलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे. आजच्या दिवशी १९७१ मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला तसचं पाकिस्तानी आक्रमणापासून महिला आणि मानवी मूल्यांची जपणूक केली असं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. बांगलादेशची निर्मिती देखील १९७१ मध्ये आजच झाली असल्याचं ते म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही शहीदांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करत आदरांजली वाहिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!