सामाजिक न्याय विभागात बदली नियमाला तिलांजली !

मुंबई पत्रकार
मा.सागर कांबळे
राज्य शासनाच्या बदली अधिनियमानुसार कोणत्याही विभागातील वर्ग अ, ब, आणि क अधिकारी व कर्मचारी यांना कमाल तीन वर्षे एका विभागाचा कारभार पाहता येतो. त्यानंतर त्यांची इतर विभागात बदली करणे क्रम प्राप्त आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने नियमाला तिलांजली दिली आहे.
त्यातील सामाजिक न्याय विभागासह अनेक विभागात कक्ष अधिकाऱ्यांपासून सहसचिव पदापर्यंत अनेक अधिकारी एकाच विभागात आहेत. शासनाने एकाच विभागातून दुसऱ्या विभागातुन बदलीच केली नाही. तर काही अधिकाऱ्यांना कक्ष अधिकाऱ्यांपासून सहसचिव पर्यंत विभागात पदोन्नती देण्यात आली असल्याचे चित्र गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. अशा अधिकारांमुळे सर्वसामान्यांचे काम अडवले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करण्यात येत असून मात्र त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये या अधिकाऱ्यांना त्याच विभागात बढती देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या निर्णयात कुठल्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात पदोन्नती देण्यात आली हे तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे का ? बदलीचे अधिनियम काय सांगतो .?
शासकीय कर्मचारी हा गट क मधील बिगर सेक्रेटरीएट सेवेतील असेल तर, अशा कर्मचाऱ्यांनी धारण केल्याचा पदावर दोन वर्षे पूर्ण पदावधीची सेवा पूर्ण केल्यानंतर, त्याची त्या कार्यालयातून किंवा विभागातून दुसऱ्या कार्यालयात किंवा विभागात बदली करण्यात येईल याशिवाय असा कर्मचारी सेक्रेटरीएट येत असेल तर, अशा कर्मचाऱ्याला तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी त्याच पदावर ठेवण्यात येणार नाही असा हा अधिनियम सांगतो तर याच्या वरती कारवाई होणार की नाही…? मोठी शोकांतिका आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत