महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

बौद्धानी एकत्र येण्याची हिच वेळ योग्य

अरुण गाडे


प पु डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14ऑक्टोबर 1956ला दिक्षाभूमी नागपूर येथे 7लाख लोकांना एकाच वेळेस शांततेतच्या मार्गाने धम्म दीक्षा दिली. जगाच्या पाठीवर रक्ताचा एकही थेंब न सांडता एकाकवेळी लाखोच्या संख्यने लोकांनी धर्म परिवर्तन करणे ही अभूतपूर्व क्रांतिकारी घटना आहे आणि जिथे ही दिक्षा दिली त्यास दीक्षा भूमी म्हणतात..या देशातील बौद्ध समाज आमचा बाप, यांनी दिलेल्या शिकवणी नुसार ” शिका -संघठीत व्हा -संघर्ष करा या शिकवणीनुसार, शिकला, शिक्षित झाला, त्यामुळे नंवं बौद्धामध्ये क्रांतिकारी परिवर्तन झाले.

गावाकुसाबाहेर राहणारा अस्पृश्य समाज शिक्षित झाला, जसं जसा समाज शिक्षित होत गेला तसा तो संघटित होत गेला आणि अन्याया विरोधात संघर्ष करायला सिद्ध झाला. सत्तेत हा समाज आला नसला तरी सत्ताधाऱ्याना वठणीवर आणण्याचे कसब आंबेडकरी समाजाने प्राप्त केले.

बौद्ध समाजाच्या प्रगतीमध्ये प्रेरणा आहे ती म्हणजे मृत झालेल्या समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा देणारी व माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य देणारी प्रेरणाभूमी दीक्षाभूमी आहे.
प पु डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अस्पृश्य व वंचित समाजाच्या अनेक पिढ्या गौरवशाली व स्वाभिमानाने जगतील असा हा भीम पराक्रम म्हणजे धम्म दिक्षा देऊन केला.. जगात रक्ताचा एकही थेंब ण सांडता लाखोलोक एकाचवेळी जिथे धर्मांतर करतात ती पवित्र भूमी म्हणजे नागपूर दिक्षाभूमी. आज या भूमीवर या देशातील कट्टर हिंदू वादी संगठना म्हणजे आर एस एस या देश विघातक संघटनेने हळू हळू या दीक्षा भूमीवर प्रतीक्रांती च्या स्वरूपात पाय पसरून आमची क्रांती भूमी गिलंकृत करू पाहत आहे याला कारणीभूत दीक्षा भूमी स्मारक समिती ठरत आहे. या समितीतील लोकं या कट्टरपंथी हिंदू संघटनेचे वयक्तिक लाभासाठी हस्तक झाले आहेत ही खेदाची बाब आहे. या लोकांना गद्दार म्हणणे योग्य आहे. 1जुलै रोजी दीक्षाभूमीच्या अंडर ग्राउंड खोदकाम बाबत उग्र आंदोलन झाले. मुळात तिथे पार्किंगची गरज नाही व फक्त अंडर ग्राउंड पार्किंगच्या नावावर खोदकाम करून बोधी वृक्ष व स्तूपाला हानी पोहचण्याचं षडयंत्र हे आर एस एस चं असल्याची भावना बौद्ध जनतेची झाली. व ती योग्य होती. म्हणून तिथे आपणास बौद्ध जनतेचा उद्रेक दिसला.

आंबेडकरी समाज कुठल्याही नेत्यावर विसंबून राहलेला नाही, नेते फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याच काम करतात… गेली अनेक वर्ष रिपब्लिकन चळवळ या नेत्यांच्या अट्टहाहासाने खिळखिली च नव्हे नेसतानाबूत झाली. एकावेळची ही शेर असलेली नेते इतकी गद्दार व नालायक असतील असं स्वपनताही कुणाला वाटलं नाही.. आम्हा समाजाला शहाणपण शिकवणाऱ्या या नेत्यांनी संपूर्ण शोषित, वंचित समुहाच सत्यानाश केला तरीही अजून त्यांची मुजोरी गेली नाही. स्वाभिमानाच्या नावावर अजूनही ते आम्हाला मूर्ख बनवीत आहे.

खैरलांजी, घाटकोपर अनेक लढे या समाजाने या नेत्याच्या भरवशावर लढली नाहीत. समाज स्वयं स्फूर्तपने एकजूट झाला व लढला.
कालपरवाचा दीक्षाभूमी वरचा उद्रेक हा सरकार व स्मारक समितीच्या षडयंत्र विरोधात हॊता.आणि महत्वाची बाब म्हणजे दिक्षाभूमी स्मारक समितीच्या काही लोकांनी जनतेला तुमसे जो होता है उखाड लो ही भाषा वापरल्याच समजलं म्हणून जनता चिडली.
अचानक आंबेडकरी नेत्यांना उपरती आली व या घटने नंतर त्यांची प्रतिक्रिया ऐकू येऊ लागली, इतके दिवस झोपले होते का?
या आंदोलनात बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल व विविध सामाजिक संघटनाची एकजूट दिसली त्यामुळे सरकार घाबरल.

माझ्या धम्म बांधवानो स्मारक समिती बदलवयाची आहे. बुद्धीष्ट सोसायटी ला किंवा सर्व संघटना मिळून एक समिती गठीत करून त्याकडे दीक्षा भूमीचा कारभार सोपवावा असे मला वाटते.(या आंदोलनात बुद्धिस्ट सोसायटी नी घेतलेली भूमिका योग्य आहे )

यापुढे समाजाने एकजूटव्हावे मी अनेक कार्यक्रमातून वारंवार हेच मी ????सांगत आलो आहे.एकही नेता लायकीचा नाही. समाजाने एकजीव व एकजूट होऊन लढल्यास मग रस्त्यावरची लढाई असो या कॉर्पोरेशन या विधानसभा निवडणूकीची…विजयी आपण होऊच . म्हणून सर्व बांधवानी एकत्र येण्याची हीचं वेळ योग्य आहे..
जयभीम -नामोबुध्दाय ????????
आपल्या प्रतीक्रिया अपेक्षित
आपलाच
अरुण गाडे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!