महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

|| यज्ञावर संत तुकाराम महाराजांचे परखड विचार ||

mn sonawane pune

ब्राह्मणांचा असा दावा आहे की,
पर्जन्येष्टी यज्ञ ह्या यज्ञा मुळे पाऊस पाडला जातो …
यज्ञ भवती प्रजन्ये।
यज्ञ कर्म सामुभ्दव।।
अर्थात यज्ञानेच पाऊस पडतो कर्मा पासुन यज्ञ हेच आदितत्व आहे.

परंतु वास्तविक पाहता भगवत गिते मध्ये १२-१२ वर्षाचे दुष्काळ पडल्याचे वर्णन आहे आणि दुष्काळा विषयी गितेत विश्वमित्र ॠषीचा उल्लेख आहे. विश्वमित्र मोठा ॠषी याला ह्या बारावर्षाच्या भंयकर दुष्काळात आपला जीव वाचविण्या साठी कुत्र्याचे मांस खावे लागले. जर यज्ञाने पाऊस पडत असता तर वेदरचना करनारा यज्ञाचे पौरोहित्य करणार्या विश्वमित्र ॠषीने पर्जन्ययज्ञ करुन पाऊस पाडला असता परंतु हे करताना दिसत नाही यज्ञाने पाऊस पडतो ही ब्राह्मणाची काल्पनिक कथा आहे.

संत तुकाराम ब्राह्मणांच्या पर्जन्येष्टी यज्ञाच्या थोथांडावर आपल्या अभंग वाणीत वैचिरिक सिद्धांत मांडतात…

पापचिया मुळे | जाले सत्याचे वाटोळे ||
दोष जाले बळिवंत | नाही ऐसी जाली नीत ||
मेघ पडो भीती | पिके सांडियली क्षिती ||
तुका म्हणे काही | विदा वीर्य शक्ति नाही ||
—— संत तुकाराम महाराज

पाऊस निसर्ग नियमा प्रमाणे पडतो, भुमी आपल्याला धान्य पिकवतेइ हे नैसर्गिक आहे, सर्व काही यज्ञातून होत नाही. संत तुकाराम महाराजांनी वैदिक पंडितांच्या “पोकळ” शब्दावर ओढलेले हे असुड होते. ब्राह्मणांच्या मर्मावरच जबरदस्त आघात होता.

ब्राह्मणांचे “यज्ञ” हे अतिशय महत्वाचे स्थान आहे. कारण यज्ञा मध्ये पशुबळी दिल्याने पुण्य मिळून स्वर्ग प्राप्त होतो हे ब्राह्मणाचे तत्वज्ञान होते. वैदिक अनुयायांचे धार्मिक कर्मकांडाचे यज्ञ हे प्रभावी हत्यार होते.

《《 वैदिकधर्मात ” यज्ञात ” दिला जाणार्या पशुबळी प्रथेच्या विरोधात बुद्ध – महाविर यांनी कडाडून विरोध केलेला आहे. तथागत बुद्धांना वैदिकांच्या यज्ञातिल प्राणीहत्या मान्य नव्हती म्हणूनच पंचशीलेतिल पहिलेच शील—
पाणातिपाता वेरमणिसिक्खापदं समादियामि || अर्थात..
मी जीवहिंसे पासून अलिप्त राहन्याची शिकवण ग्रहण करतो. ही प्रतिज्ञा बुद्धांच्या धम्मात दिलेली आहे आणि हिच शपथ वारकरी संप्रदायात वारीकरी घेतात.
तथागत बुद्धाने यज्ञ सिद्धांत तिरस्करणीय मानून यज्ञाचा तिव्रशब्दात धिक्कार केला आहे
हिंसा-हत्या कामवासनेचा मिथ्याचार, असत्य-खोटीभाषा,उत्तेजक मद्यपान या पासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा सर्व श्रेष्ठ यज्ञ आहे
असे तथागत बुद्ध सांगतात. 》》

संत कबीरा पासून ते संतुकाराम महाराजां पर्यंत सर्व संतांनी ब्राह्मणाच्या वैदिकधर्मशास्त्राला आवाहन केले की, जर ब्रह्मज्ञाना नुसार सर्व चराचर एकाच ब्रह्म तत्वापासून बनलेलं आहे. त्याला परमब्रह्म म्हटलं जातं. याच तत्वाच्या आधारे, वेदांनी भेद केला असला तरी, उपनिषदांत चराचरात अभेद असल्याचं सांगितलं गेलं आहे. चराचरात ब्रह्म आहे, चराचरात देव आहे म्हणून त्यांची बाह्य रुपं भिन्न भिन्न असली तरी त्या सर्वांचं मूळ रुप एकच आहे असा विचार मांडला गेला. याच आधारे संतांनी मानवी एकतेचा पुरस्कार केला वर्ण, जाती, लिंग, शरीर, कातडीचा रंग ही भिन्न असली तरी त्यात वसणारं ब्रह्मतत्व एकच आहे. म्हणून सर्व समान आहेत. ही चराचरातली समता हेच सत्य आहे.
“ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ।।”
—–सत्याचा अनुभव ज्याला येतो, त्याच्याजवळ देव असतो असं तुकाराम महाराज सांगतात—–
“देव तया जवळी असे । पाप नासे दर्शने ।।”
—ती व्यक्ती इतकी पवित्र असते की तिच्या दर्शनानेही माणसाचं पाप नष्ट होतं—–
असं तुकाराम महाराज सांगतात.

ब्राह्मणाचा असाही दावा आहे की आम्ही पृथ्वीवरील “भूदेव” आहोत…..
वैदिक पंडीत स्वतःला भुदेव म्हणवून घेतात. ते म्हणतात….

देवा अधीन जगस्तर्व
मंत्रा अधीन देवते ।
ते मंत्र अधीन ‘ब्राह्मण’
ब्राम्हण मम देवतम ।।

देवाच्या अधीन अर्थात हातात संपूर्ण जग आहे परंतु हा देव मंत्राच्या अधीन आहे आणि हे मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत. तेव्हा ब्राह्मण हेच देव आहेत…..

संत तुकाराम महाराज ब्राह्मणाच्या या बनवेगिरीला सरळ प्रश्न विचारतात•••••

दैवते असती तयाच्या हाती ।
मग का मरती त्याची नातेगोती ।।
—-संत तुकाराम महाराज—-

सर्वसामान्य लोकांच्या मन आणि मेंदूचा जबरदस्त ताबा घेनारे ब्राह्मणाचे प्रभावी हत्यार म्हणजे “पुराणातिल कथा” आणि *”दंतकथा” होय…..

नका दंतकथा येथे सांगो कोणी |
कोरडे ते मानी बोल कोण ? ||
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार |
न चलती चार आम्हांपुढे ||
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी |
राजहंस दोन्ही वेगळाली ||
तुका म्हणे येथे पाहिजे जातीच |
येरा गाबाळाचे काम नाही ||
—–संत तुकाराम महाराज———-

पोकळ , अर्थहिन, अनुभविन परंपरेने पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या कथा दंतकथा – पुरणकथा आम्हाला सांगू नका, या कथेत स्वअनुभव नसलेल्या, विवेकनिष्ठा नसलेल्या प्रत्यक्षाचा आधार नसलेल्या कल्पित गोष्टी सांगुन लोकांना फसवू नका

निवडी वेगळे क्षीर आणि पाणी |
राजहंस दोन्ही वेगळाली ||
संत तुकाराम राजहंसाचं उदाहरण देऊन स्पष्ट करतात आम्हाला प्रत्यक्ष पुरावा पाहिजे. सत्याचा आधार पाहिजे. कही तरी सोंग करून लोकांना भुलवू पाहणाराचे चाळे आमच्या पुढे चालणार नाहीत

मित्र हो !!,

पुराण कथेचे सामर्थ्य फार प्रचंड असते. पुराणातील कथा मानवी मनाला झपाटुन टाकतात मानसाची तर्क शक्ती , विवेक शक्ती बधिर करतात शुद्र अतिशुद्रावर प्रभाव गाजविनारे वैदिकब्राम्हण पुराण कथांचा वापर हे मनुवाद्याच्या हाती असलेले अतिशय धारदार हत्यार आहे दतकथा-पुराणकथे मध्ये असलेले देवाचे अवतार कल्पना वैदिक पुराणिकांनी बहुजनांच्या मन-मेंदू-मस्तकात चांगलीच रुजवली आहे.

हे उदाहरण पहा….
आपल्याला उदाहरण समजून घ्यायचं नाही. उदाहरणा ऐवजी त्याचा संदर्भ समजून घ्यावयाचा आहे. कारण उदाहरण हा आपल्या चर्चेचा विषय नाही, संदर्भ हा आपल्या चर्चेचा विषय आहे. जर आपण उदाहरणाला धरून ठेवले तर संदर्भाचा अर्थच बदलेल……

भगवत गीतेत साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणतात—–
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत: । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगें युगें ।।
अर्थात—-
जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येईल, समाजाचं पूर्ण अध:पतन होईल, समाज रसातळाला जाईल, समाजात दुष्टांचा प्रादुर्भाव वाढेल तेंव्हा तेंव्हा अधर्माचा नाश करुन, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करुन सज्जनांचं रक्षण करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेईन

संत तुकाराम महाराज यांच्या वेळी सोषित-पिडीत गोरगरिबांची स्थिती आणि परिस्थिती भयानक होती तेव्हा तुकाराम महाराज आपल्या अभंग गाथेत म्हणतात…..
“तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ।।”
संत तुकाराम महाराज म्हणतात “हे देवा तु लोकांच्या मदतीला धावून येण्या ऐवजी झोपलेला आहेस”
बहुजानांच्या वेदना – दुःख त्यांची गरिबी-लाचारीचे जगणं तुला दिसत नाही का? माणसा सारख्या माणसाला ब्राह्मणाच्या वैदिक व्यवस्थेने जनवरा सारखा गुलाम केले आहे हे तुला कळत कसं नाही. संत तुकाराम लोकांना सांगु लागले की, तुमच्या दुखःचे कारण गेल्या जन्माचे कर्म नसून देवाच्या नावाने तुमच्यावर लादलेली धार्मिक गुलामी आहे.

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीचे असूड वैदिकब्राम्हणी व्यवस्थेवर कसे ओढले ते पहा……..
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड ।
काय त्यासी रांड प्रवसली
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ।
शुद्ध उभयंता कुळ याती
ऐसा हा निवाडा जाळासे पुराणी ।
नव्हे माझी वाणी पदरीची
तुका म्हणे आगी लागो
थोरपणा ।
दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी।।

पुढे ते सांगतात••••

किर्तनाचा विकारा मातेचे गमन ।
भाड खाई धन विटाळ तो ।।१।।

हरिकथेची विक्री करणे,त्यापासून धन मागणे हे मातेशी गमन केल्या प्रमाणे आहे. अशा प्रकारचे धन मातेची भाड घेण्यासारखे होय. हे वाईट मार्गाने असल्याने त्याचा विटाळच होतो.

संत तुकाराम महाराजांचे वैदिकब्राम्हणा बरोबरचे वैर व्यक्तिगत कारणातून निर्माण झालेले नव्हते तर वैदिक ब्राह्मणांच्या अनैतिक-संस्कार व संस्कृति विरोधी वैचारिक भुमिका संत तुकारामानी घेतली होती.

जेंव्हा एखादा मणुष्य आपल्या दूरदृष्टीने, आपल्या न्यायाच्या नजरेने, समाजव्यवस्थेला काही नवे वळण देऊ पाहतो. जुन्या व्यवस्थेतील दूषित घटक दूर करून काही ताजे, टवटवीत असे नवे करू पाहतो. काही नवी स्वप्ने पाहतो, नवा विचार करतो. पण त्याच्या मणात जे काही नव्याने उगवलेले असते, ते प्रत्यक्ष फुलवण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला, तर प्रस्थापित व्यवस्थेचे ठेकेदार सर्व अंगाने त्याच्यावर कोसळतात. अशा वेळी तो मणुष्य लेचापेचा असेल, त्याची आपल्या विचारावरची निष्ठा कच्ची असेल, आपल्या विचारा स्वतंत्र्या पेक्षा आपली तात्कालिक सुखे त्याला महत्त्वाची वाटत असतिल, तर तो माघारी फिरतो, आपल्या मनात उदभवलेले विचार मनातल्या मनात जिरू देतो, शरणागती पत्करतो.

पण,

काही माणसे तशी नसतात. आपल्या मनातील विचारावर त्यांचे इतके प्रेम असते,की त्या विचारापुढे जगातील इतर सर्व गोष्टी त्यांना तुच्छ वाटतात. आपण उचलेले पाऊल आपल्याला अखेरीस मृत्यूच्या जबड्यात घेऊन जाईल, याची त्यांना पुरेपुर कल्पना असते. आपला मृत्यू समोर दिसतो तरीही ते आपल्या कार्याची निष्ठा तिळमात्र ही कमी होत नाही. तुकाराम महाराजांनी नेमके हेच केले होते म्हणूनच ते अभंग गाथेत सांगतात•••••••••

विवेकाने वागा। होऊनी निर्भय,
अशुभाचे भय। निर्बुद्धीना।।
सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
चाला, नाही मागे आला कोणी।।
———-संत तुकाराम महाराज
•••••••••••••••••••
संग्रहीत mn sonawane pune
•••••••••••••••••••

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!