राज्यात घाशीराम कोतवालांचं राज्य-राऊत

संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. काही वेळापूर्वीच माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी वक्तव्य केलं आहे.
“पुण्यात पेशवेकाळात घाशीराम कोतवाल होता. सरकार तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवत आहेत. त्यांना कुठली नैतिकता आहे? दुसऱ्यांवर हे बोट उचलत आहेत. महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत. घाशीराम कोतवालाचा कार्यकाळ बघा, त्याच्या काळात लूटमार, दरोडेखोरी, कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत अनागोंदी होती. घाशीराम कोतवालावर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. त्याने ज्या पद्धतीने लूटमार सुरु करुन आपल्या बॉसेसना पैसे आणि सगळंच पोहचवत होता. घाशीराम कोतवाल हे नाटक फार गाजलं महाराष्ट्रात. घाशीराम कोतवाल ही विकृती होती. आज या राज्यावर घाशीराम कोतवालांचं राज्य आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत