महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अंतिमतः भारतीय जगावे, किर्तीरूपे उरावे.

प्रा.मुकुंद दखणे.
मातीवर,जन्मभूमीवर, मानवतेवर,राष्ट्रावर प्रेम करणारी माणसे ही, ब्राह्मण, हिंदु,(मराठा,कुणबी,…) मुस्लिम,बौद्ध, ख्रिश्चन, शिख
म्हणून,डोक्यात घेणे ही अमानवियता
होय, क्रुरता होय..मनुवादी मानसिकता होय.

राष्ट्रनिर्मितेच्या कार्यात सहभागी प्रतेक मनुष्य हा “प्रथम आणि अंतिमतः भारतीय च असतो.”
आणि
म्हणूनच अशा महान व्यक्तिमत्वास भारतीय म्हणून च
ओळखले पाहिजेत.

” भारतीय ” ही ओळख महानतेचे
प्रतीक असते.कारण या भारत भूमीत तथागत बुद्धा चा जन्म झाला, ज्याने समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे बीजारोपण केले.आणि म्हणूनच भारत ही बुद्धभूमी म्हणूनच जगात प्रसिद्ध आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणारे आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे किंवा स्वातंत्र्यासाठी लोकशाहीला जींवत ठेवण्यासाठी संग्राम करीत असलेल्या भारतीयांना
जर आपण जातीब्राह्मण, मराठा, कुणबी…हिंदुु,मुस्लिम, ख्रिश्चन, शिख,बौद्ध
वगैरे जात धर्म नावे ओळखत राहणार असेल, तर असे समजावे कि भारताला मिळालेले महत्त परिश्रमाने प्राप्त स्वातंत्र्य आणि भारतीय संविधानाच्या निम्मीतांने
पुनर्जन्मीत झालेली लोकशाही
ही अधिक काळ टिकणार नाही.
आणि जर आपले स्वातंत्र्य व लोकशाही आपणास शाश्वत टीकावी असे वाटत असेल, तर आपण व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनात आपली जात, आपला समाज, आपला धर्म, पंथ वगैरे
विसरून आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मताप्रमाणे, ” *अंतिमतः भारतीय” म्हणूनच
वावरले पाहिजे,देवाणघेवाण करून जगले पाहिजे.
आणि
हे आवश्यक जीवनतत्व तेव्हाच शक्य आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, ” जाती व्यवस्थेचे (मनुब्राह्मणी व्यवस्था)आणखी खास वैशिष्ट्ये आहे. ज्याचे अनिष्ट परिणाम होतात आणि ते लोकशाहीला प्रतीकुल ठरतात. जातीव्यवस्थेत राष्ट्र
नसून, एक दुसर्यांचा, द्वेष, क्रमाक्रमाणे तिरस्कार, उचनीच भावनेतून तुच्छता असल्याने होणारा घातक परिणाम म्हणजे परस्पर सहकार्य करणार्या भावनेला (बंधुत्व)
आणि इच्छेलाच ती उध्वस्त करते.
आणि त्यातुन मानवता व राष्ट्रीयत्व खत्म होते, राख होते.
आणि म्हणूनच,
आज स्वातंत्र्याच्या 50 वर्षाच्या दरम्यान आपण सर्व भारतीयाने,
अंतिमतः भारतीय म्हणूनच सवय
लावायला सुरुवात नाही केली, तर
तो विजय स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही भारतीय संविधान विरुद्ध
मनुमानसिक वैदिक जाती ब्राह्मणांचा ठरतो. जे राष्ट्र विरूद्ध आहे.म्हणूनच आपल्या भारतीयांचे विचार आणि आचार हे अंतिमतः भारतीय असणारेच असावे, तरच भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे.

प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954

*

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!