महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मविआची नवी बदमाशी सुरू सावधान..

समाज माध्यमातून साभार

२०२४ ची लोकसभा संपली विधानसभा तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे आणि म्हणून सरंजामी वृत्तीच्या मविआ ने नरेटीव सेट करण्याची तयारी चालविली आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया मध्ये बातमी सुरू झाली आहे…!

मविआ मध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान नाही. या बातमीचा अर्थ काय.? ही बातमी कुणाच्या हवाल्याने दिली.? पुढे प्रश्नार्थक चिन्ह का लावले.? मविआ मधील प्रमुख पक्ष कोणता.? युती, आघाडी करण्याचा अधिकार कुणाला आहे ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात तरीही मनुवादी मिडिया सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी बातम्या दाखविणे, लिहणे सुरू करतो आणि आपले भाबळे मतदार षढयंत्रकारी सवर्ण पत्रकारांच्या जाळ्यात अलगद अडकतात आणि सापनाथाला मते देण्याचं मन बनवतात म्हणून महाराष्ट्रातील मतदारांनो सावधान. मविआ आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये कुठलीच चर्चा, बैठक नाही.कुणीच कुणाला प्रस्ताव दिला नाही. लोकसभा निवडणुकीचे योग्य विश्लेषण सुद्धा करुन झाले नाही तरीही वंचित बहुजन आघाडीची बातमी दाखवून, लिहून संभ्रम निर्माण करण्याचं सत्र सुरू झाले आहे. ही बदमाशी आहे हे आंबेडकरी मतदारांनी समजून घेतले पाहिजे..!

मनुवादी मिडिया सामान्य मतदाराला संभ्रमित करण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या चालवितो. त्या बातमी मध्ये कुठलीचं सत्यता नसते, बातमीला कोणताच आधार नसतो. आणि ठरवून एखाद्या राजकीय पक्षाला बदनाम करण्यासाठी हा चालविलेला कुटील डाव असतो. भारिप बहुजन महासंघाने २००९ मध्ये कॉंग्रेस पक्षाकडे युतीचा प्रस्ताव पाठविला होता, त्यावेळी कॉंग्रेस पक्षाने भारिप बहुजन महासंघासोबतं युती केली नाही. २०१४ मध्ये भारिप बहुजन महासंघाने कॉंग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांना युतीचा प्रस्ताव पाठविला होता, परंतु कॉंग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी भारिप बहुजन महासंघा सोबतं युती केली नाही..!

२०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस पक्षाकडे युतीचा प्रस्ताव पाठविला होता, त्यावर कॉंग्रेस पक्षाने एआयएमआयएम पक्षा सोबतची युती तोडा तरच बोलणी सुरू होऊ शकते असा आक्षेप नोंदवला आणि युती केली नाही. २०२४ मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी तयार झाली. त्या इंडिया आघाडीत समावेश व्हावा म्हणून १ अॉगस्ट २०२३ ला आठ महिने अगोदर वंचित बहुजन आघाडी ने युतीचा प्रस्ताव पाठविला होता, परंतु युती झाली नाही..!

हा कॉंग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा इतिहास आहे. गेल्या २० वर्षापासून सातत्याने भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस पक्षाकडे युतीचा प्रस्ताव पाठविते मात्र कॉंग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबतं युती करीत नाही हे वास्तव आहे, कॉंग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबतं युती का करीत नाही.?याचे उत्तर कॉंग्रेस पक्षाला कोणत्याच चॅनेलचा पत्रकार मागतं नाही, पुरोगामी संपादक मागतं नाही. निखिल वागळे,संग्राम पाटील सारखे एकांगी भुमिका घेणारे मागतं नाही.मात्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाला हेरून हेरून प्रश्न विचारला जातो की, कॉंग्रेस पक्षासोबत युती होणार की, नाही. युती किंवा आघाडी करण्याची जबाबदारी एकाच राजकीय पक्षाची असते का.? युती किंवा आघाडी हे दोन्ही पक्षांची गरज असते म्हणून होते..!

वंचित बहुजन आघाडी चे नेतृत्व हेकेखोर आहे हे सिद्ध करण्यासाठी एका बाजूने प्रश्नांचा भडीमार होतो मात्र कॉंग्रेस पक्षाने सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये म्हणून कधीतरी वंचित बहुजन आघाडी कडे युतीचा प्रस्ताव पाठविला का? हा प्रश्न पत्रकार,संपादक,निर्भय वाले, भाडोत्री संग्राम पाटील,भाडोत्री निखिल वागळे यांच्या कुणाच्याच मनात उपस्थित का होतं नाही मग हे पत्रकार आणि संपादक कसे..?

दोन दिवसांपूर्वी एनडीटीव्ही च्या कुलकर्णी नावाच्या पत्रकाराने बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेतली तो सुरुवातीलाच बाळासाहेब आंबेडकर यांची भरभरून स्तुती करीत होता. मी तुमचा खूप आदर करतो असेही सांगतं होता तेव्हा मला चटकन निखिल वागळे यांची आठवण झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निखिल वागळे बाळासाहेब आंबेडकर यांची स्तुती करीत होता मी बाळासाहेब आंबेडकर यांचा चाहता आहे असेही ठोकून देतं होता लोकसभा निवडणुक लागली आणि निखिल वागळे याने बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्याची मोहीम राबविली हा अनुभव लक्षात घेऊन आंबेडकरी जनतेने कुठल्याही पत्रकाराच्या गोड बोलण्याला बळी पडू नये हे लक्षात घ्यावे. सगळे सवर्ण एकाच माळेचे मणी आहेत, ते केसाने गळा कापण्यात वाकबगार आहेत. मिडिया ने वंचित बहुजन आघाडीच्या बदनामीची नवी इनिंग सुरू केली आहे ते आंबेडकरी,दलित,मुस्लिम,आदिवासी समुहाने समजून घ्यावे. तिसऱ्या बाजूने प्रस्थापित राजकीय पक्षांकडून सुपारी घेऊन काही दलाल प्रवृत्तीचे लोकं बाळासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडियावर व्यक्तीगत पातळीवर येऊन बदनामी करीत आहेत..!

वंचित बहुजन आघाडीचे तीन शत्रू कार्यरत झाले आहेत, मिडिया, प्रस्थापित राजकीय पक्ष आणि तथाकथित आंबेडकरवादी. सामान्य आंबेडकरी जनतेने या तिघांपासुन सावध राहायला हवे. विधानसभा निवडणुकी पर्यंत केवळ बदनामी, मना मनात विष पेरणी आणि व्यक्ती द्वेषाची भाषा वापरली जाणार आहे..!

राजकारणात वरील तिन्ही गोष्टी वंचित समुहाला सत्ता देणार नाहीत म्हणून बदनामी करणारे,व्यक्ती द्वेष किंवा विषारी भाषा वापरणारे यांना रोखठोक जागेवरच विचारा यातून वंचित घटकांना सत्ता परिवर्तन मिळेल का ? यातून वंचित समुहाचे हित साधता येईल का ? मग द्वेष पेरणी कशासाठी ? एकाच राजकीय पक्षाच्या नेतृत्वावर टिका टिप्पणी का ? इतर राजकीय पक्षाचे नेतृत्वावर तुम्ही टिका का करीत नाही. मतदार सावध झाला तर सत्तेचे प्रयोग यशस्वी होतील. मतदार संभ्रमित राहीला तर वंचित समुहाला सत्तेचे प्रयोग यशस्वी करता येणार नाहीत हेही लक्षात घ्यावे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!