महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

विषमतावादी लोकांची कबर खोदता येईल व समतेच्या प्रवाह पुढे नैता ऐइल. विनायकराव जामगडे

परमपूज्य डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्कापासून वंचित समाजाला हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजविले. त्यासाठी सतत जागते राहून समाजाला अंधश्रद्धा, अज्ञानाच्या खाईतून काढण्यास मेहनत घेतली. ज्यांना सावली जवळ उभे करत नव्हते त्यांना अधिकाराच्या जागा मिळवून दिल्या. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ,हा मूलमंत्र देऊन समाजात शिक्षणाची आवड निर्माण केली समाजात आपण अशिक्षित आहोत परंतु माझा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा सारखा शिकून मोठा झाला पाहिजे हा ध्यास समाजातील प्रत्येक लोकात निर्माण झाला. समाजाची एक पिढी शिकून मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा करून आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत. प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा आपला प्रभाव पाडलेल्या आहे साहित्य, राजकीय , प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर ह्या समाजातील सुजान लोक कार्यरत असून आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्य द्वारे आपले वेगळी प्रतिमा निर्माण करीत आहेत त्यामुळे विषमतावादी विचारधारेचे लोकांना ह्याचा हेवा वाटतो. व समाजात आलेली जनजागृती ही अशीच वाढत गेली तर आपली जात श्रेष्ठतत्त्वाची वर्णवादी व्यवस्था कोलमडू शकते. म्हणून ह्या आलेल्या जागृत समाजात दुही निर्माण करून कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. सत्तेचा मोह सर्वांनाच असते समाजात सत्तेसाठी आसुसलेल्या लोकांना हाताशी धरून आपली विषमतावादी विचारधारा पसरविण्याची कार्य जोरात सुरू आहे .डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घ्यायचे त्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करून ते कसे हिंदू धर्म सुधारक होते हे जनतेमध्ये पोचविण्याचे कार्य सुरू आहे. हे कार्य आंबेडकरवादी असल्याचे सांगणाऱ्या करवी करीत आहेत त्यासाठी पैसा,सत्ता,प्रसिद्धी सरकारी पदात समावेश करून समतावादी चळवळीला परिवर्तनाच्या चळवळी पासून दूर लोटण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केला जातो. समतावादी विचारांच्या लोकांची एकजूट होणार नाही ते आपल्या अहंकारात राहतील सत्तेचे तुकडे चघळन्यातच मग्न राहतील. ते डोळ्यात तेल घालून जागृत आहेत समतावादी बुद्ध धम्मात आपली प्रशिक्षित माणसे पाठवून चळवळीची दिशा वळविण्याचा प्रयत्न होत आहे. दीक्षाभूमी ते संघ भूमी हा प्रवास सुरू झालेला आहे दीक्षाभूमीवर आलेल्या विदेशी पाहुण्यांना संघ भूमीवर नेऊन समरसतेचे वातावरणात त्यांचा वेळ घालविला जातो ज्या दीक्षाभूमीवर मानवी गुलामीची साखळी तोडून मुक्ततेचे जीवन जगण्यास मोकळीक निर्माण केली ती दीक्षाभूमी व उंच जातीय श्रेष्ठत्व कायम राखण्यासाठी धडपडणारी विषमतावादी व्यवस्था निर्माण करणारी संघ भूमि ह्या दोन परस्पर भिन्न विचारांच्या वेगळ्या भूमी असताना दीक्षाभूमी कडून संघ भुमीकडे प्रवास कसा काय अशु शकतो. विषमतावादी चे स्वागत जर दीक्षाभूमीवर होत असेल तर आपण परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी सांगितलेल्या सामाजिक समतेच्या विचारापासून दूर जात नाही काय? समतावादी भगवान गौतम बुद्धाच्या विचार बाबासाहेबांनी दिला.लोकशाही प्रणालीद्वारे राजकीय शक्ती निर्माण करून सत्तेत सहभाग घेण्यास सांगितले त्यासाठी आपली स्वतंत्र राजकीय पक्ष मजबूत असावा दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊ नये तर आपला स्वतःचा मार्ग जो समतावादी असेल दलित पीडित अस्पृश्य समाजाच्या उत्थानाचा असेल ह्या मार्गाने मार्गक्रमण करून समतावादी प्रवाह मजबूत करावा ही अपेक्षा बाबांची होती. परंतु समतावादी असल्याच्या दावा करणारे मी म्हणेन तोच मार्ग खरा ह्या अंहकारात जगत असून परिवर्तन चळवळ दिवसेंदिवस कमजोर होत आहे. प्रत्येक जणांनी विषमतावादी व्यवस्था मुळासहीत उखडून फेकली पाहिजे असा सूर लावतात परंतु समतावादी विचारांची एकजुटीची मोट बांधत नाही. वेगळे राहण्यातच आनंद मानत आहेत. मलाच समतावादी परिवर्तनवादी चळवळीचा मार्ग समजला आहे मी सांगेन तीच दिशा खरी आहे ह्याच अहंकारात जगत आहेत तर दुसरीकडे लाचारिची फौज निर्माण होत आहे मलाच आंबेडकर समजला आहे मी त्या घराण्याच्या असल्यामुळे मी जो सांगत आहे तोच आंबेडकरवाद हा आरंभ असल्यामुळे एकजूट होण्यास अडचण निर्माण होत आहे सेवानिवृत्त अधिकारी केवळ समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी चळवळ करण्याचे कार्य करताना दिसतात ज्यानी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीच्या वाढीसाठी विचार पसरविण्यासाठी घालविला त्यांना किंमत न देता तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यांचे तोंड पाहत नाही. आंबेडकरी विचारवंत म्हणविणारे सुद्धा एकत्र येत नाही तर वेगवेगळ्या राहण्यातच आनंद मानत असतात विषमतावादी लोकांनी आंबेडकरी विचार व चळवळीसमोर आव्हान उभे केले आहे. आंबेडकरी चळवळीवर विषमतावादी व्यवस्था आक्रमण करून आंबेडकरी चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे यासाठी ज्यांना आंबेडकरी चळवळ एकजूट झाली पाहिजे ती वाढली पाहिजे ही भूमिका ज्यांना मान्य आहे त्यानी अहंकार सोडून सर्वांना सामावून घेऊन समतेच्या करूनेचा प्रवाह वाढीस लावण्यास हातभार लावावा जेणेकरून विषमतावादी लोकांची कबर खोदता येईल व समतेच्या प्रवाह पुढे नैता ऐइल. विनायकराव जामगडे ९३७२४५६३८९, ७८२३०९३५५६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!