पुण्य म्हणजे कुशल कर्म

कुशल कर्म हे दहा प्रकारचे आहेत ते कर्म केल्याने त्याची फळप्राप्ती
१)दान कर्म
२) शीलकर्म
३) ध्यान (भावना )कर्म
४) अपच्चायन (श्रद्धा) कर्म
५) पेय्यावच्च (जनसेवा) कर्म
६) पट्टीदान (श्रेयाचे हस्तांतरण)
७)अनुमोदन(दुसऱ्याच्या कुशल कर्मात आनंद व्यक्त करणे)
८) धम्म श्रवण करणे
९) दुसऱ्यास धम्म सांगणे
१०) दिटठीज्जुकम्म(त्रिरत्ना ला शरण जाणे)आणि जागरूकता
दानाने दान कर्म केल्याने संपत्ती मध्ये वाढ होते.
शील शीला चे पालन केल्याने श्रेष्ठ आणि सुखी कुळात जन्म होतो.
ध्यान भावना केल्याने रूप किंवा अरूप लोकात जन्म होतो तसेच उच्च दर्जाचे ज्ञान आणि स्वतंत्रता प्राप्त होते.
श्रेयाचे हस्तांतरन कर्म केल्याने पुढील आयुष्यात आवश्यक गोष्टींची मुबलक प्राप्ती होते.
दुसऱ्याच्या आनंदात आनंद व्यक्त केल्याने पुढील आयुष्यात अति आनंदाची प्राप्ती होते.
धम्म श्रवण करणे किंवा धम्मदेसना करणे हे प्रज्ञाप्राप्तीत सहाय्यक ठरते.
श्रद्धा हे श्रेष्ठ जनकत्व प्राप्त करून देते.
जनसेवेने लोकप्रियता प्राप्त होते. जनाधार प्राप्त होतो.
अनुमोदन केल्याने म्हणजे दुसऱ्याच्या कुशल कर्माची प्रशंसा केल्याने स्वतःला सुद्धा प्रशंसनिय ठरते
त्रिरत्नाच्या शरणाने कामवासनेचा समूळ नाश होतो.
जागरूकता हे नानाविध सुखप्राप्तीला सहाय्यक ठरते.
कुशल कर्माची फळे ही तात्काळ अनुभवला येतील असे नाही त्यांना उशीरही लागतो . मात्र त्या फळांची निश्चिती
आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत