महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ऐतिहासिक गडकिल्ल्याचे अस्तित्व धोक्यात,किल्ल्यांचा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर

ऐतिहासिक गडकिल्ल्याचे अस्तित्व धोक्यात,अनेक किल्ल्यांचा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर,हे नष्ट उध्वस्त होण्यापासून आपण रोखलं पाहिजे आणि झोपी गेलेल्या सरकारला आपण जागा केलं पाहिजे,
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रहितेच राज्य उभ करून अनेक गड किल्ले निर्माण केले,त्याच गडकिल्ल्यांना वाचवण्यासाठी हजारो मावळ्यांनी बलिदान दिले स्वतःची कुर्बानी दिली,अनेक मावळ्यांनी निर्धार केला होता आपण मेलो तरी चालेल पण गळ किल्ले वाचले पाहिजेत,आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं,हे वचन मावळ्यांनी दिले, असं काय होतं गडकिल्ल्यात अनेक मावळ्यांनी बलिदान दिले.?.अनेक लढाया करून मृत्यूला समोर जाऊन गडकिल्ले वाचवण्याचा काम केलं असं काय होतं गडकिल्ल्यात.?.पाच-सहा वर्ष गड किल्ल्यासाठी लढाया लढावा लागल्या,असं काय होतं त्या गडकिल्लेत एवढे वर्ष मावळे शत्रूशी जीव की प्राण असेपर्यंत झिंज देत राहिले.?.

महाराजांनी गडकिल्लेच का बांधले.?.मंदिरा का बांधले नाही.?. महाराजांनी गडकिल्ल्यालाच का महत्व दिलं.?.त्याचं कारण रक्ताच्या थेंबा थेंबातून हे गडकिल्ले मावळ्यांनी निर्माण केले जे चंद्र सूर्य असेपर्यंत या रहतेचा इतिहास सांगण्यासाठी तटमानाने उभे आहेत,खरा रक्तरंजित इतिहास त्या गडकिल्ल्यात आहे,परंतु आज त्याच ऐतिहासिक गडकिल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आला आहे,अनेक ऐतिहासिक गडकिल्ल्याचा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर,अनेक गडकिल्ले आज उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत पुरातत्त्व विभाग व प्रशासनाने या गड किल्ल्यांचा जन उद्धार केला पाहिजे सर्व किल्ल्यावरचे मुख्य दरवाजे,गडाचे तटबंदी,बुरुज,नगारखाने जे जे काही तुटलेल्या अवस्थेत असेल ते पुन्हा निर्माण करून ऐतिहासिक वारसा जपून ठेवला पाहिजे

सगळ्या किल्ल्यावरच्या विहिरीची स्वच्छता मोहीम करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे,जगातून किल्ले पाहण्यासाठी येणारे प्रत्येकांना गडकिल्ले पाहून एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे,कसे हे गडकिल्ले बांधले असतील याचा आत्मपरीक्षण येणाऱ्या पिढीने केलं पाहिजे, त्यासाठी महत्त्वाचे आहेत हे गडकिल्ले तुटण्यापासून वाचवणं आणि किल्ल्यांचा जनोद्धार करणं हे काम राज्य सरकारने केले पाहिजेत हे आम्ही मागणी करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आपल्याला टिकव्याचा असेल तर सर्वच्या सर्व गडकिल्ले टिकून राहिले पाहिजेत ते पुन्हा निर्माण झाले पाहिजेत हजारो वर्षापर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत तो इतिहास जगापुढे गेला पाहिजे यासाठी गडकिल्ले आपण वाचवले पाहिजेत एवढेच या माध्यमातून अपेक्षा करतो,गळ आला माझा सिंह गेला हे वाक्य प्रत्येकांच्या लक्षात असलं पाहिजेत हे आव्हान करतो,

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!