निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

शत्रूचा शत्रू

संजय घोडेकर

. लोकसभा 2024 च्या निवडणुका पार पडल्या, ‘ रालोआ ‘ सरकारचा शपथविधी रविवार, 9 जून रोजी संध्याकाळी 7.15 वाजता पार . ह्या निवडणुकीचे एक विशेष म्हणजे महाराष्ट्रात आंबेडकर अनुयायी मतदार बांधवांनी एक गठ्ठा ‘ रालोआ ‘ उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मते दिली ही बाब कुठेही चर्चिल्या जात नाही, म्हणजेच आंबेडकर अनुयायी राजकीय ताकद अनुलेखाने मारण्याचा प्रकार आहे. वास्तविक मोदी – शहाची हुकूमशाहीच्या दिशेने होणारी वाटचाल रोखण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचे रक्षण करण्याच्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेबांचे रिपब्लिकन अनुयायी
समाजाने निवडणुकीच्या पटलावर अग्रक्रमाने आणले.
रिपब्लिकन पक्षाच्या एक सुद्धा प्रतिनिधीला महाविकास आघाडीने बरोबर घेतले नाही तरीसुद्धा ‘ रालोआ ‘ च्या उमेदवाराचा पाडाव झालाच पाहिजे म्हणून रिपब्लिकन पक्षसंघटना मिळून प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या बॅनरखाली ‘ रालोआ’ उमेदवार पडलाच पाहिजे,त्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा निवडून येऊ शकतो, त्याला मते द्या ही आमची भूमिका आमच्या मतदार बंधू भगिनींनी तंतोतंत अमलात आणण्याचे सिद्ध झाले आहे. त्याला कारणही तसेच होते मोदी शहा ही जोड गोळी भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही शासन व्यवस्था नष्ट करू पाहत होती. ह्याचे गांभीर्य फक्त रिपब्लिकन पक्ष,संघटनांना होते.
. ‘ रालोआ ‘ चा पाडाव झालाच पाहिजे म्हणून रिपब्लिकन अनुयायी. पेटून उठलेत हे लपून राहिले नाही. महाविकास आघाडीच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी प्रागतीक रिपब्लिकन आघाडीच्या नेते मंडळी बरोबर तीन मीटिंगा केल्यानंतर त्यांना कळून आले की किती देता – किती घेतो या प्रकारातील हे फ्रंटवाले नाहीत. मात्र राजकीय चांगल्या ओळखी झाल्या.
. ‘ रालोआ ‘ आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला पाहिजे म्हणून त्यांच्या विरोधात असलेला शिवसेना ( उबाठा ),काँग्रेस उमेदवार निवडून आला पाहिजे ही भूमिका घेताना ह्या पक्षाच्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाबरोबर काय व्यवहार केले हे आम्ही विसरलेलो नाही, तो सल मनात होताच, परंतु या निवडणुकीची परिस्थिती किती विचित्र होती हे सांगण्याची गरज नाही.
. ह्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रागतिक रिपब्लिकन आघाडी उभी करून पक्ष, संघटना, विचारवंत कार्यकर्ते जे येतील त्यांना बरोबर घेऊन श्याम दादा गायकवाड, सयाजी वाघमारे,सुधाकर सुरवाडकर,डॉक्टर संजय अपराती,प्राध्यापक इंदिरा आठवले, अरविंद सोनटक्के अशा हजारो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन राजकीय शक्ती दाखवून देण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या प्रति असलेले निष्ठा समाजाला दिसून आली आणि दुसरी गोष्ट चांगले घडवण्याची रिपब्लिकन चळवळीत प्रक्रिया चालूच राहिली पाहिजे.

संकलक
संजय घोडेकर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!