महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

आंबेडकरवादी विचारधारेचा वाढ व विकास कसा होऊ शकेल.

डॉ. धूतमल


आंबेडकरवाद वाढ व विकास व्हायचा असेल तर येत्या दहा वर्षांमध्ये फक्त सामाजिक काम करावे लागेल प्रत्येक बहुजन जाती जातीत व सर्व धर्मामध्ये कार्यकर्ते निर्माण करावे लागतील जोपर्यंत cadre based कार्यकर्ते प्रत्येक जातीत निर्माण होणार नाहीत तोपर्यंत सामाजिक परिवर्तन यशस्वी होणार नाही, तोपर्यंत धार्मिक परिवर्तन यशस्वी होणार नाही, जोपर्यंत सामाजिक परिवर्तन यशस्वी होणार नाही तोपर्यंत राजकीय परिवर्तन होणे शक्य नाही.
आपल्या बऱ्याच लोकांनी लोकांना जोडले पण त्याचे राजकीय परिवर्तनामध्ये रूपांतर करता आले नाही किंवा खूप घाई केली असे म्हणता येते. त्यामुळे जोडले गेलेले मुस्लिम शीख लिंगायत ख्रिश्चन ओबीसी पुन्हा लांब गेलेले दिसत आहेत. जोपर्यंत इतर अनुसूचित जाती जमाती ओबीसी लोकांना आपण जोडू शकत नाही. तोपर्यंत सामाजिक धार्मिक राजकीय परिणाम साधने शक्य नाही. त्यामुळे येत्या दहा वर्षांमध्ये सामाजिक परिवर्तनाचे काम केल्याशिवाय आंबेडकरवादी संघटनांना दुसरा मार्ग नाही यावर आंबेडकरवादी प्रबुद्ध लोकांनी गांभीर्याने विचार करायला हवा.

आपल्यामध्ये कोण फूट पाडत आहे एकाच विचारधारेच्या लोकांमध्ये तुकडे कोण करत आहे याचा गांभीर्याने विचार करून त्या लोकांना खड्यासारखे दूर सारणे आवश्यक आहे EVM विरुद्ध, जनजागृती व आंदोलन सुद्धा सुरू ठेवणे गरजेची गोष्ट आहे. ईव्हीएम हटवण्याशिवाय भारतातील लोकशाही टिकू शकणार नाही RSS बीजेपीच्या विचारधारे विरुद्ध मोठ्या प्रमाणात काम करणे गरजेची गोष्ट आहे.
त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यामध्ये प्रवेश करून त्या लोकांना बहुजनवादी बनवण्या शिवाय आपल्यापुढे पर्याय नाही यावर गांभीर्याने विचार व्हावा. येत्या काळामध्ये आंबेडकरवादी पक्ष उभा राहील व परिवर्तन करेल असे वाटत नाही त्यामुळेच सर्व विरोधी पक्षाचे रूपांतर आंबेडकरवादी समर्थक पक्षामध्ये करणे याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय दिसत नाही व त्यानंतर आपण आंबेडकरवादी पक्ष व संघटना निर्माण करून वाढवू शकू ही लढाई अजून खूप काळ चालणार आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे, ताबडतोब परिणामांचे अपेक्षा करणे हे चूक राहील तसेच लोकांना खूपच मोठी अशा दाखवणे खूपच मोठे आश्वासन दाखवणे हे बंद करायला हवे अन्यथा आंबेडकरवादी लोकांमध्ये सध्या आलेली निराशा ही वाढत जाईल व येणाऱ्या काळामध्ये निराशा मध्ये गेलेले लोक आंदोलन मोडून टाकतील हा मोठा धोका आंबेडकर वादाला आहे भूतकाळात आपण केलेल्या चुका जर आपण सुधारू शकलेलो नाही तर येणारा काळ आपल्याला सामाजिक राजकीय धार्मिक दृष्ट्या वाईट असेल म्हणून मित्रांनो प्रबोधनाशिवाय पर्याय नाही.
भूतकाळात केलेल्या चुका आपण त्यांच्या अनालिसिस करून पुन्हा टाळणे गरजेचे गोष्ट आहे यावर चर्चा अपेक्षित
डॉ धूतमल

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!