इंडिया गठबंधनने सरकार बनवावं

आर.के.जुमळे
आता लोकसभेच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे.
एनडीए गठबंधनला २९१ जागा, तर इंडिया गठबंधनला २३४ व इतरांना १८ जागा मिळाल्यात. अशाप्रकारे ५४३ जागांची वाटणी झाली आहे.
यावरून कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला निर्विवाद कौल मतदारांनी दिलेला नाही, हे उघड झालं आहे. तथापि गठबंधन म्हणून एनडीएला बहुमत मिळाले आहे, असे मानता येईल.
मागील दहा वर्षात भाजपचे सरकार होते. त्यांनी ‘४०० के पार’ असा नारा दिल्याने संविधानप्रेमी भयभीत झाले होते. देशात प्रचंड प्रमाणात महागाई आणि बेरोजगारी वाढली होती. म्हणून ‘अच्छे दिन’ कधी पाहताच आले नाही. त्यातल्या त्यात अनामिक भीतीपोटी भ्रष्टाचारांना आपल्या कंपूत ओढत त्यांना अभय दिल्या जात असल्याचं जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होते.
यामुळे भाजपचे ‘४०० के पार’ नारा मतदारांनी
प्रत्यक्षात जमिनीवर उतरू दिलं नाही. यातच भाजपचा सपशेल पराभव झाला असे म्हणता येईल.
एनडीए गठबंधनमधून आंध्राचे चंद्राबाबू नायडू यांचे १६ खासदार, बिहारचे नितेशकुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचे १२ खासदार व चिराग पासवानच्या लोकजनशक्ती पार्टीचे ५ खासदार असे एकूण ३३ खासदार निवडून आले आहेत. वास्तविक हे पुरोगामी पक्ष आहेत, असे म्हणता येईल. पण परिस्थितीपाई ते एनडीए गठबंधनमध्ये सामील झाले होते.
नितीशकुमार यांनी बिहारमध्ये जातवार जनगणना केली होती. ती राष्ट्रीय स्तरावर करण्याचे आश्वासन काॅंग्रेसने दिले आहे. भाजपचा जातवार जनगणनेला विरोध आहे. म्हणून या तिन्हीही पक्षांचे जर ३३ खासदार एनडीए गठबंधनमधून बाहेर पडले तर ही संख्या २५८ च्या खाली उतरते. आणि सरकार बनवायला किमान २७२ खासदार पाहिजे असल्याने एनडीए गठबंधन सरकार बनवू शकणार नाही. म्हणून या तिन्हीही पक्षांनी इंडिया गठबंधनमध्ये सामील होऊन सरकार स्थापन करायला मदत करायला पाहिजे हेच शहाणपणाचे पाऊल ठरेल असे वाटते.
आर.के.जुमळे
9326450506
दि.५.६.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत