महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

जितेंद्र आव्हाड प्रेमींनो आधी आक्षेप तर दाखल करा…

राजेंद्र पातोडे

काळजी नको आव्हाडांनी मागणी केली तरी त्यांना तूर्त फाशी होणार नाही, मात्र जितेंद्र आव्हाडांसाठी कलम बेगारी करून अभ्यासक्रमांत मनुस्मृतीचा समावेश व्हायचा थांबणार नाही.त्यासाठी आक्षेप दाखल करावे लागतील.विशेष म्हणजे आक्षेप दाखल करण्यासाठी ३४८ पानांचा प्रस्तावित शिक्षण धोरण आराखडा वाचवा लागेल.कारण आक्षेप नेमका कोणत्या मुद्द्यावर आणि तो कितव्या पानावर आहे, हे गुगल फॉर्म मध्ये नमूद करावे लागणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने SCERT, Maharashtra ने राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 State Curriculum Framework (SCF 2024) (पायाभूत स्तर) चा मसुदा तयार केलेला आहे.
सदर आराखडा https://www.maa.ac.in येथे उपलब्ध केला आहे. सदर आराखडा वाचून आपले अभिप्राय खालील लिंक वर द्यायचे आहेत.
आपले अभिप्राय ०३ जून २०२४ पर्यंत दिले जावू शकतात.तो वर जितेंद्र आव्हाड ह्यांना काही फाशी होणार नाही.त्यांनी मागणी केली असली तरी त्यांचे विरुद्ध दाखल गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही.आव्हाड किती फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, ह्याचे कवन आणि आरत्या ओवाळणारे नागपूर औरंगाबादी, मुंबईकर अजून मला आक्षेप दाखल केलेल्या यादीत दिसले नाहीत म्हणून म्हटलं.
लिंक दिली आहे ह्यावर देखील चार ओळी खर्डे घसाई करा.झालाच तर बहुजन विद्यार्थ्यांचे भवितव्य साठी तुमच्या तळमळीचा उपयोग होईल.
आक्षेप काय दाखल करायचे आहेत ते समजून घ्या.
नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचे नावावर भाजप आणि संघाचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे.भारतीय ज्ञानप्रणाली या घटका नुसार मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय वादग्रस्त निर्णय घेतला गेला आहे.तसेच अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; तर आराखड्यात मनुस्मृती समावेश करण्याचा राज्य मंडळाच्या शाळांमधील प्रस्तावित निर्णय पूर्णपणे असवैधनिक असून विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागनारा प्रस्ताव अजेंडा देशावर थोपविण्यत येत असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे.
राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे. याशिवाय मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला गेला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे.नव्या शैक्षणिक धोरणात राज्याच्या आरखड्यात प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सूचवण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
देशावर एकधर्मिय परंपरा लादण्याचा डाव आहे.
शिक्षण हक्क कायदा विरोधातील विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची शिक्षा देखील आराखड्यात देण्यात आली आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शारीरिक किंवा मानसिक हिंसेचा अनुभव येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश रद्द करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकता येत नाही. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात कायद्याशी विसंगत सूचना देण्यात आल्याचे दिसून येते. शालेय प्रक्रिया या घटकांत वादविवादांचे निराकरण, शिस्त यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास शाळेतील प्रवेश रद्द करणे, शाळेतून कायमची हकालपट्टी करणे किंवा कायमचा प्रवेश रद्द करणे असे टोकाचे निर्णय सूचवण्यात आले आहेत.
हे राष्ट्रिय शिक्षण धोरण नसून धार्मिक तेढ निर्माण करून एकच धर्माचे तृष्टिकरण करण्याचा घाट घातला जात असून वंचित बहुजन आघाडी ह्या प्रस्तावाचा निषेध करते.सोबतच मोठ्या प्रमाणत जनतेने त्यावर आक्षेप दाखल करून सदर शिफारसी घटनाबाह्य असल्याच्या सूचना कराव्यात.तसेच राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा हा धार्मिक शिक्षण ऐवजी नवीन
जागतिक तंत्रज्ञान शिकविणारा असावा अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीने सर्वात आधी केली आहे.
ह्या बरोबर अनेक विषय आहेत आक्षेप दाखल करण्याजोगे ज्यात १३आद्यप्रवर्तक, विचारवंत, समाज सुधारक देखील आहेत.त्यात गिजुभाई बधेका नावाचे गुजराती शिक्षक आणि कविता लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी त्यांचे जीवनकार्य नमूद केले आहे.ह्यात राज्यातील काही शिक्षण तज्ञ, सुधारक सावित्रीमाई, फातिमा शेख नाहीत.अजून तुम्हाला माहीत असलेले सुधारक, विचारवंत, आद्यप्रवर्तक समाविष्ट नसतील तर त्यावर आक्षेप दाखल करा.
https://tinyurl.com/SCF-FS- Responses या लिंकवर नोंदवावेत.आपले अभिप्राय scffsresponces@maa.ac.in
येथे ईमेल द्वारे ही पाठवता येणार आहे.
लवकर आक्षेप दाखल करून झाले की तुम्ही आव्हाडांना जामिनासाठी तुमची कागदपत्रे द्यायला मोकळे व्हाल…

राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश.
9422160101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!