मुख्य पान

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर ३०२ धावांनी दणदणीत विजय मिळवत, उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला , भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात आठ बाद ३५७ धावा केल्या. शुभमन गीलनं ९२, विराट कोहलीनं ८८, श्रेयस अय्यरनं ८२, रविंद्र जडेजानं ३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेल्या श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद झाला.

जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघा भारतीय गोलंदाजांनी आपल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रत्येकी एक गडी बाद केला. पाच षटकात एका निर्धाव षटकासह १८ धावा देत, पाच बळी घेणारा मोहम्मद शमी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!