महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशैक्षणिक

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या बार्टी युपीएससी कोचिंगचे विद्यार्थी भोगतात मरणयातना?-अँड.कुलदीप आंबेकर

मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यातील येरवडा येथे बार्टी संस्थेची निवासी युपीएससी कोचिंग बँच सुरू करण्यात आली होती.सद्या तेथील विद्यार्थी काय करतात कसे जगतात.हे पाहुन मुख्यमंत्री ही तोंडात बोट घालतील.

कारण अशरक्ष;काही विद्यार्थी तर मानसिक त्रासाला कंटाळुन कोर्स सोडुन गेले आहेत.याला कारणीभूत बार्टी संस्था त्यांचे भ्रष्टाचारी व नतद्रष्ट अधिकारी आहेत.

मुळातच ही बँच 6 महिने ईतर संस्थेच्या तुलनेने उशीरा सुरु झाली होती.येथे सुसज्ज अशी लायब्री नाही.बरं आहेत त्या लायब्रीत दर्जदार पुस्तक,युपीएससीच्या अभ्यासाचे साहित्य नाही.नामांकीत शिक्षक स्टाप नाही,वसहतीगृहात पाणी नाही.विद्यार्थ्यांना व्यक्तीगत कोणाचं मार्गदर्शन नाही.टेस्ट सिरीज होत नाही,वसहतीगृह आवारात मेस उपल्बध नाही.विध्यार्थ्यांनीना महिला अधिक्षक नाही.असे जर असेल तर हे विद्यार्थी IAS/IPS अधिकारी होणार तरी कसे?

अर्थिक हलाखीच्या परिस्थितीत जगणारे ग्रामीण भागातील हे सर्व विद्यार्थी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर सीईटी उत्तीर्ण होउन क्लास करायला येतात.तिथे यांची असे अतोनात हाल करत असतील..

बरं हे दीडशाहाणे अधिकारी विद्यार्थांना सल्ला देतात,की तुम्ही संघर्ष करुन जगा.जणु काय यांच्या बापाची बार्टीची मालमत्ता आहे.विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी भेटायला गेले मोठी अक्कल पाजळतात.नेहमी उडवाउडवीची उत्तर देतात.चालढकल करतात.

करोडो रुपयांचा चूराडा करुन असे क्लास चालवले जात असतील सक्सेस रेशो वर तर न बोलले लंच बरं..तर मग कसे अधिकारी होणार!निकाल लागला की आमचेच विद्यार्थ्या करत येतात..

खरंच शरमेची बाब आहे ही. आपण या भावी अधिकार्‍यांना हिन वागणुक देता..उपकाराची भाषा वापरता…गिरे तो भी टांग उपर असी बार्टीची अवस्था.

अँड.कुलदीप आंबेकर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!