कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दारुड्या मित्राने घेतला बळी; तरुणाई जीवघेण्या वळणावर !- आई वडिलांनी लहानाचं मोठं करायचं आणि दारुड्या मित्रांनी जीव घ्यायचा, ही कसली मैत्री ?

कोल्हापूर : आजकाल जिवलग मैत्री ची व्याख्या बदलत असून नवीन पिढी च्या मते घट्ट मैत्री म्हणजे एकमेकांसोबत शिवीगाळ करणे, कपडे फाडणे, मारामारी करणे, दारू प्यायला सोबत देणे, नशा पाणी करणे इत्यादी. कांहीं तरुणांना यात कसलंच काय चुकीचं दिसत नाही पण जन्म दिलेल्या आई वडिलांना मात्र काय वाटत असेल याचा विचार ही तरुणाई करत नाही. शेवटी काय, अती तिथे माती !

दिनेश सोळांकूरकर आणि संगमेश तेंडुलकर हे दोघे एकमेकांचे मित्र होते, मिळून रात्रभर दारू प्यायले आणि दारूच्या नशेत एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली.

कोल्हापुरमधून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक करण्यात आलेली आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर घटनास्थळी दहशतीचं वातावरण आहे. दारूच्या नशेत ही घटना घडली आहे.

दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून अमानुषपणे खून केला आहे. ही घटना राजारामपुरी येथे सातव्या गल्लीत घडली. ही घटना रविवारी पहाटे घडली आहे. दिनेश अशोक सोळांकूरकर, असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर यास अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!