पित्रोदां चा तडकाफडकी बळी ? – प्रा रणजीत मेश्राम सर

भारतातील राजकारणाशी सतत निकट असलेले सॅम पित्रोदा यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. अवघड आहे.
ते, इंडियन ओव्हरसीज कांग्रेस चे अध्यक्ष होते. आधीपासून ते कांग्रेसशी निकट आहेत. त्यांनी एका विदेशी चर्चेत केलेल्या वक्तव्यावरुन कल्लोळ केला गेला. कल्लोळाचे पुढारपण दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी केले.
८ मे बुधवारी कल्लोळ माजला व त्याच सायंकाळी तात्काळ पित्रोदा पायउतार झाले.
पित्रोदाचा असा बळी देणे वा घेणे उचित आहे काय ? पित्रोदा असे भयंकर काय म्हणाले ? ते भारतीयांची वैशिष्ट्ये सांगत असावेत. ते म्हणाले, ‘पूर्वेकडील लोक चिनीसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे व दक्षिणेकडील लोक आफ्रिकन लोकासारखे दिसतात. पण, त्यामुळे काही फरक पडत नाही. आपण सर्व बंधू भगिनी आहोत.’
पित्रोदांना भारतातील विविधता सांगतांना सामाजिक सलोखा सांगायचा असेल. पण, तो त्यांनी असा मांडला. बस्स, वक्तव्याला कोलित केले गेले. संबंधित वर्णद्वेषी विधान आहे. त्वचेच्या रंगावरून भारतीयांना मोठी शिवी दिली. आम्ही सहन करणार नाही. राष्ट्रपती मुर्मू ह्या आफ्रिकन वाटतात काय ? वगैरे.
तात्काळ कांग्रेसने दखल घेतली. सायंकाळी पित्रोदा ने राजीनामा दिला. दुपारी कल्लोळ, सायंकाळी राजीनामा !
हा विषय असा संपावा का ? कल्लोळी पक्ष स्वतः द्वेषावर आधारित आहे. त्या पक्षाची, व्यवस्थेने भरडलेल्या लोकांसाठी अजिबात हिताची भूमिका नाही. आधीही नव्हती. आताही नाही.
उलट, त्याच पक्षाला जबरदस्त लक्ष्य करता आले असते !
त्याच दिवशी प्रधानमंत्री हे दुसऱ्या सभेत, अंबानी अदानी यांचेकडून किती माल मिळाला .. टेम्पोत भरलेल्या नोटा मिळाल्या की नाही .. असे अजब विचारतांना दिसले.
मात्र, ज्या पक्षावर हा जिव्हारी मारा होतो तो पक्ष वेळ मारुन नेतांना दिसतो. ही ‘स्ट्रॅटेजी’ आहे असे सांगितले जाते. असेलही.
० ज्येष्ठ विचारवंत आयु प्रा. रणजित मेश्राम सर.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आहेत)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत