छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना सामुहिक अभिवादन

कर्मचाऱ्यांच्या व गरीब होतकरू पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
छत्रपती शिवाजी महाराज महत्म ज्योतीबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५ वा जयंती उत्सव समितीच्या वतीने दि म्हाडा कर्मचारी यांच्या वतीने ९/ ५ / २०२४ रोजी म्हाडाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामुहिक जयंती साजरी करण्यात आली
सकाळी या तीन महामानवांना पुष्पांजली अर्पण करण्यात येऊन दुपारी कर्मचाऱ्यांच्या पाल्याना वह्या वाटप, म्हाडा कर्मचारी यांच्यावतीने संस्कृतीक कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर या महामानवांना मा. संजीव जयस्वाल (उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा )यांच्या प्रा. विक्रमसिंह मगर( इतिहास अभ्यासक )यांनी आदरांजली पर मार्गदर्शन केले. यावेळी मा.मिलिंद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ ) मा.धीरजकुमार पंदीरकर
(मुख्य अभियंता) मा.राजकुमार सागर (सचिव, म्हाडा )मा.अनिल वानखडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा )मा.रविंद्र पाटील (मुख्यअधिकारी, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ )
मा.मारोती मोरे(मुख्य अधिकारी, कोकण मंडळ ) मा.उमेश वाघ (सह मुख्य अधिकारी, मुंबई इ दु व पु मंडळ ) आदिजनांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर विचारे (अध्यक्ष -संयुक्त जयंती समिती ) यावेळी सोनाली पाटील यांनी बाई तुम्ही वाडयतून जा हे विनोदी कथा नाटक सादरी करण केले कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन – एस के भंडारे (सरचिटणीस, संयुक्त जयंती समिती )यांनी केले. शेवटी आभार दिगंबर नाईक यांनी मानले .या कार्यक्रमास म्हाडा अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय, बांद्रा परिसरातील जनताही मोठया प्रमाणात उपस्थित होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत