अक्षय_तृतीया

आज अक्षयतृतीया म्हणजे बामण परशुरामाचा तिथीनुसार जन्मदिवस. तो नेमका कधी होता की नव्हता हे ही नक्की नाही.! या परशुरामाची गोष्टही चमत्कारीकच.! हा फार रागीट होता तो !! कारण याचा बाप बामण रुषी जमदग्नीही अत्यंत कोपिष्ट रुषी ज्याने तप करुन ? खूप ज्ञान मिळवले. एकदा जमदग्नी बाण मारण्याचा सराव करीत होता व भयंकर उन्हात त्याची पत्नी रेणुका मारलेले बाण परत आणून देत होती तिच्या पायात त्यावेळी चपलेचा, पादुकांचा शोध लागला नव्हता, नव्हती त्यामुळे तिचे पाय उन्हाने भाजले म्हणून ती काहीवेळ झाडाखाली थांबली तर या जमदग्नीला रेणुकेचा खूप राग आला( हेच बरं का ते तप करुन मिळवलेले ज्ञान ) कारण तिने यायला उशीर केला, म्हणून जमदग्नीने त्याच्या चार मोठ्या मुलांना सांगितले की रेणुकेचे मुंडके उडवा.! (हेच बरं का तप करुन मिळवलेळे ज्ञान )पण ते चौघे मातृभक्त होते त्यांनी जमदग्नीचे ऐकले नाही, मग थोड्यावेळाने पाचवा मुलगा परशुराम आला, जमदग्नीने त्याला त्याच्या चारही भावांचे व आईचे मुंडके उडवण्यास सांगितले (हेच बरं का ते प्रचंड तपसामर्थ्य ) मग परशुरामाने क्षणाचाही विचार न करता रेणुकामातेचे व आपल्या चार भावांची परशूरामाने मुंडकी उडविली, मग जमदग्नीचा राग शांत झाला, ( हेच बरं का ते तपसामर्थ्य) मग नंतर जमदग्नी सूर्यावर चिडला व त्याला शाप देऊ लागला कारण सूर्याने जमदग्नीच्या पत्नीचे एकटीचेच पाय पोळवले होते बरंका, मग सूर्याने घाबरुन जमदग्नीला पादुका व छत्री भेट दिली !! (तेव्हा छत्री व चपंलांचा शोध लागला !! ) सूर्य जर तळपला नाही तर बाष्पीभवनही होणार नाही व पाऊसही पडणार नाही हे विसरायचे बरंका !! हीच ती रेणुका जिला आपण रेणुकामाता किंवा एकवीराआई म्हणतो तिची सर्व मराठा बहुजन पूजा करतात कारण ती क्षत्रिय कुळातली होती.! नंतर एका कार्तवीर्य नावाच्या क्षेत्रपतीने जमदग्नीची कामधेनू गाय मागितली (म्हणजे मागेल ती वस्तू देणारी गाय ! त्या जमदग्नीने या गायीकडे चप्पल व छत्री का नाही मागितली हे नाही विचारायचं बरं का) पण जमदग्नीने ती गाय दिली नाही, मग कार्तवीर्याने ती पळवून नेली, मग परशुरामाने त्याला मारले, मग कार्तवीर्याच्या १०० मुलांनी जमदग्नीला ठार मारले व मग परशुरामाने या १०० पुत्रांना मारले व प्रतिज्ञा केली की मी एकही क्षत्रिय पृथ्वीवर ठेवणार नाही, म्हणून त्याने सर्व क्षत्रिय ठार मारले..
मग या क्षत्रिय मराठा बहुजनांच्या विधवा झालेल्या स्रिया परशुरामाला शरण गेल्या व त्यांनी क्षमा मागितली व आमचा वंश पुढे चालू राहावा अशी विनंती केली मग परशुरामाने या आपल्या पूर्वज स्रियांना सात बामण रुषींची नावे सांगितली व या सात रुषींपासून या विधवा स्रियांना झालेली मुले म्हणजे आपण मराठा बहुजन होय. बघा आपल्या जन्माचे मूळ तर अशाप्रकारे बहुजनांचा (मराठा- कुणबी ओबीसी एस सी एसटी चा) अपमान करण्यासाठी व स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी तसेच बामनांनी केलेल्या महान उपकारांमुळेच आपण सर्व जन्माला आलो अशी भयंकर खोटी गोष्ट रचून मराठा बहुजनांचा प्रचंड अपमान करणारी ही कथा हे अक्षय्य तृतीयेचे मूळ.!
सर्व वैदिक बामणांनी रचलेल्या अनेक खोट्या पात्रांपैकी जन्माला घातलेलं एक काल्पनिक पात्र म्हणजे परशुराम होय. मराठा बहुजन छत्रपतींचा निर्वंश करणारा व या हिंसक कृत्याचं समर्थन करणारांचा क्रूरकर्मा नायक होय. आणि अशा आपल्या मराठा बहुजनांशी कसलाही संबंध नसलेल्या क्रूरकर्म्याच्या जयंतीचा आपल्या मराठा बहुजनांनाच इतका आनंद होतो की यांना कसे समजावून सांगावे हे कधीकधी कळत नाही. याने म्हणे एकदा नव्हे दोनदा नव्हे २१ वेळा मराठा बहुजन क्षत्रियांना, छत्रपतींना मारले (छत्रपती शिवरायांनाही पुण्याच्या बामणांनी हीच कथा सांगितली व भारतात आता कोणीही मराठा कुणबी क्षत्रिय राहिला नाही त्यामुळे छत्रपती शिवराय राजा बनू शकत नाही असे सांगून राज्याभिषेक नाकारला,) आणि याचा गुणगौरव करण्यासाठी त्याच्या वंशजानी म्हणजे पोथ्या पुराणे लिहिणार्यांनी याची जयंती करायला सुरुवात केली आणि ज्यांचे पूर्वज २१ वेळा मारलेत “तेही” उड्या मारुन मारुन याची जयंती “शुभमूहुर्त, शुभदिवस” म्हणून साजरा करु लागले नव्या वस्तूंची खरेदी करु लागले, शुभेच्छा देऊ अन घेऊ लागले.! अहो ज्यांचा तो पूर्वज आहे त्यांनी जयंती साजरी केली तर मान्य करु शकतो, जिंकलेले आनंद साजरा करतील हे साहजिकच. परंतु लढाई हरलेले, आपल्या स्रियांची प्रचंड विटंबना करणारा, पाठलाग करुन करुन मारणारा, आपल्या पूर्वज स्रियांच्या पोटातील गर्भसुद्धा मारुन आनंद साजरा करणारा हा आपला पूर्वज असू शकतो काय ?
बहुजनांतील मराठ्यासहित सर्वांनी सांगावे आपल्या पूर्वजांनी कधी कोणी परशुरामाचं मंदिर बांधलं का ?परशुरामाची पूजा करण्याची प्रथा आहे का मराठा बहुजनांत.? मराठा कुणबी मध्ये ? ओबीसीत, एस सी एसटी यांच्यामध्ये ? नाही ना मग कसला आनंद झालाय आपल्याला ? आपले पूर्वज मारले याचा की परशुराम जन्माला आला याचा ? मराठा बहुजनांनो विचार करा अन चुकीच्या प्रथा सोडा..
- संदर्भ: परशुराम ,जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे..? लेखक : डाॅ.आ.ह.साळुंखे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत