आज तिसऱ्या टप्प्यात आसाम मध्ये सर्वाधिक 75% मतदानाची नोंद; महाराष्ट्रात केवळ 53% तर तिसऱ्या टप्प्यात एकूण 64% मतदारांनी केले मतदान.

लोकसभा 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. एक केंद्र शासित प्रदेश आणि 10 राज्यातील मिळून एकूण 93 मतदारसंघात खासदारकी आज मतदान झाले. राज्यात उन्हाचा तडाखा आणि फोडा फोडीच्या राजकारणामुळे जनतेची मतदानाबाबत उदासीनता दिसून आली.
सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रात आज केवळ 53% मतदानाची नोंद झाली आहे. आसाम राज्यात सर्वात जास्त म्हणजे 75% मतदानाची नोंद झाली. देशभरात आज झालेल्या मतदानात एकूण 64 % मतदात्यानी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आज महाराष्ट्र राज्यासह, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक सह दादरा नगर हवेली अंदमान येथे नियोजित मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत