लोकसभा २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होत असली तरी महाराष्ट्रात मात्र “महाराष्ट्र विरुद्ध गुजरात – मोदी,शहा विरुद्ध महाराष्ट्र” अशी आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुक
कारण, मोदीं- शहांनी मुंबई- महाराष्ट्र विरुद्ध बरीच कट कारस्थाने केली
मुंबई ला कंगाल बनवणे,कितीतरी उद्योग, सरकारी आस्थापने,डायमंड-ज्वेलरी मार्केट,डेअरी हे महाराष्ट्र तून गुजरात ला पळवुन नेले. प्रकल्पांच्या नावाखाली मराठी माणसांच्या जमिनी हडप केल्या.
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना ईडी, सीबीआय चा धाक धाकवून ब्लॅकमेल केले.
महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे ईडी लाऊन ब्लॅकमेल केले .
छगन भुजबळ, नारायण राणे, अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण आणि यांचे असंख्य सहकारी, आमदार आणि खासदार…
काही लोक ईडीच्या भीतीने तिकडे गेलो असे खाजगी मधे सांगतात…
त्यामुळे महाराष्ट्र मधे पक्षफोडाफोड करून संपूर्ण जगात महाराष्ट्राची छबी खराब केली. सतत मीडियावर महाराष्ट्राचा गोंधळ दाखवायचा, महाराष्ट्रला बदनाम कराण्याचे काम केले.
मोदी शहा महाराष्ट्रचे खरे दुश्मन आहेत हे आता लपुन राहिले नाहीत.
म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार गटातील कार्यकर्ते प्रभावी पणे काम करत नाहीत. त्यांनाही किती त्रास दिलेला आहे याची जाणीव आहे. त्यांच्याही डोक्याला ईडीची बंदुक लाऊन घेऊन गेलेले आहेत.
राज ठाकरेंची तब्बल १२ ते १४ तास ईडी चौकशी केली.
त्यामुळे या सर्वांवर प्रेम करणारा मतदार यावेळी मोदींना घालवण्यासाठी सज्ज झालाय…
महाराष्ट्रात तरी ही लढाई मोदी-शहा विरुद्ध महाराष्ट्र अशीच रंगताना दिसत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत