महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

विज्ञानवादी होऊ या, भारत अंधश्रध्दा मुक्त करुया..!

बाळाला काळे टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात बालमृत्यूदर शून्य असता !

गाडीला लिंबूमिरची लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात अपघातांची संख्या शून्य असती !

पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच उद्योजक झाले असते !

बुवाबाबा कडे जाऊन दु:ख निवारण झाले असते तर समस्त बुवाबाबा भक्त सुखी दिसले असते !

कुंडल्या मिळवून नवरा बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज्ड मॅरेजेस यशस्वी झाली असती !

यज्ञ करून जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता !

चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल !!

मुहूर्ताचे वेड :

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ !

जन्मवेळ कधी मुहूर्त पाहत नाही व मरतानाही मुहूर्त पाळला जात नाही !

तरी सुद्धा सगळी जिंदगी मुहूर्त पाहण्यात व भटजींची तुंबडी भरण्यात वाया जाते !

इच्छाशक्ती प्रबळ असली की , आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ ठरतात.

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात ?

पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात, तर काही अकाली मृत्यू होतात, असे का ?

सीटबेल्ट बांधा, हेल्मेट घाला, बायकोच्या ‘करवाचौथ’ कर्मकांडावर विसंबून राहू नका !

९५ % विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत, तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा ?

मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते ? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभ मुहूर्त शोधतात. तरीही त्यांच्या योजना अयशस्वी का होतात ? तसेच मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक, राष्ट्रपती, पंतप्रधान होईल काय ?

अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली व्यक्ती पण अंबानीसारखी झाली का ?

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना, व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात. तरी सुद्धा कित्येकांना अपयश येते असे का ?

*: कारण :*

मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा भारत देश गिळून बसली. स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही ‘ शुभ मुहूर्तच ‘ असते !

चला तर मग , आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या , कष्टावर विश्वास ठेऊ या !

चला ! आपला महान भारत देश अंधश्रद्धा मुक्त करू या !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!