मनूवादी चिवरधारी भिक्खु


( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचारसरणीतून
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
आज भारतासह जी बौद्ध संस्कृती जिवंत आहे ती बुध्दाच्या मूळ शिकवणीच्या उलटपक्षी भेसळ विचारधारा जोपसणाऱ्या मनुवादी चिवरधारी भिक्षु मुळेच आहे असेच म्हणावे लागेल. कपोलकल्पित, मनगंढत कथा रचण्यामध्येच तल्लीन आहेत. जसे - जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत नाही ते जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकून राहणे पसंत करतात हे तत्त्वज्ञान बुद्धाच्या धम्मात कसे आले ? ही मान्यता तर हिंदू धर्मात आहे. हिंदू धर्मानुसार 84 लाख योनी भोगल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो.त्या 84 लाख योनीतून मुक्त होण्यासाठी तर ते यज्ञयाग आणि दानधर्म करून पुण्य प्राप्त करतात. म्हणजे मृत्यू आला तर स्वर्गात जाऊन मदिराचा ग्लास हातात घेऊन आणि मदमस्त होऊन अप्सराचे नृत्य गायन पाहतात. पण असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आतापर्यंत कोणीही नाही. हे फक्त देवांचा राजा इंद्र आणि त्याच्या अधीन असलेले देवता गण करतात. ज्याने पाप केले असेल तो नरकात जाईल. हीच धारणा बुद्ध धम्मात आहे.बुद्ध धम्मात स्वर्ग ऐवजी सुगती आणि नरक ऐवजी दुर्गती! पण काही ठिकाणी ब्राह्मण पण हेच म्हणतात पहा -
जर एखाद्या मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो,.
बुद्ध काय म्हणतात ते पहा -
ज्याला मृत्यू नाही असे काही जन्माला येऊ शकत नाही. ही सर्व गोष्ट प्राणिमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्म साधना होय
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं.140 अनु. क्रं.7 आणी पृष्ठ. क्रं.141 अनु. क्रं.11. ह्यात ब्राह्मण म्हणतात –
ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून ते प्रार्थना करतात आणी बुद्ध म्हणतात -
जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्म साधना होय.
उपरोक्त दोन्ही ठिकाणी एक बाब कॉमन आहे, ती म्हणजे जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त सुटण्याची इच्छा करणे हिंदू धर्मात ८४ लाख योनीचा एक निश्चित आकडा तरी दिला पण बौद्ध धम्मात तो आकडा पण नाही.म्हणजे अनंत भवचक्र म्हणजे जन्ममरणाची ये जा ! जर जन्म मरणाचा फेरा नष्ट करायचा असेल तर कमीत कमी मनुष्याने या जन्मात फाशी घेतली तर ह्या मनुष्य योनीतून क्षणात मुक्ती मिळेल. दुसऱ्या योनीत काय होईल ते होईल. खरोखरच बुद्धाचे हेच तत्त्वज्ञान होते काय ? त्यांनी तर या जन्माचे दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग सांगितला होता आणी आहे. आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते लक्ष देऊन एकाग्रतेने अध्ययन करावे लागेल… पहा.
एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे. हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माच्या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय स्वीकारला. ” जुन्याच बाटलीत त्यांनी नवी दारू ओतली.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं.83 अनु. क्रं.3. प्रकरण – 2. बुध्दाने कोणते बदल केले.? प्रथम खंड भाग – सातवा.
ह्यात जुनी बाटली कोणती ? त्या जुन्या बाटलीत कोणती जुनी दारू होती ? आणि बुद्धांनी ती जुनी दारू काढून कोणती नवी दारू ओतली ? हा प्रश्न जर समजला नाही तर धम्म काय समजणार ? म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिचय मध्ये बुध्दाचे जीवन व शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकयावर अवलंबून राहून बुद्धाची जीवन कथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रक्रिया येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. परिचय.
महामायेच्या मृत्यूनंतर 42 वर्षांनी बुद्धाने ज्ञानप्राप्तीनंतर सात वर्षांनी तावंतीस देव लोकात ब्रह्मडातून आलेल्या देवांच्या समोर आपल्या आईच्या सतत तीन महिने या अभी धम्माचा उपदेश दिला
संदर्भ – अभिधम्म पिटक. पृष्ठ. क्रं.14 प्रथम – पैराग्राफ आणी पृष्ठ. क्रं.20. दुसरा पैराग्राफ. पहिल्या दोन ओळी.
विनयपिटक नुसार अहर्त पद कसे प्राप्त होते ते पहा –
……….आनंद म्हणतो , ” सगळे जीवन आपण भगवंताच्या सानिध्यात घालून अखेर काय तर काहीच नाही हे त्यांच्या मनाला लावून गेले आणि तो मनातच म्हणाला , ह्या शरीराचे काहीही होवो, पण मी संगतीत जाईन ( बुद्धाच्या निर्वाणानंतर झालेली प्रथम संगीत ) अशी प्रतिज्ञा करून आनंद बऱ्याच रात्रीपर्यंत कायानूस्मृती करीत करीतच आता तो मनात उदास होऊनच रात्रीच्या शेवटच्या प्रकारात झोपण्यासाठी अंथरुणावर पडला आणि काय ? एकदमच जमिनीवरून पायावर उचलल्या गेले व डोके उशीवर ठेवणे अगोदरच त्यामधील क्षणातच त्याचे चित्त आश्रवरहीत झाले. ( चित्त – मल वेगळे झाले ) म्हणजे आनंद अहर्त झाला.
संदर्भ – विनयपिटक. पृष्ठ. क्रं.30 खालच्या चार ओळी आणी 31 मधील प्रथम तीन ओळी.
श्रवण परंपरा थी, यह तो सत्य है , तो ग्रंथ का उल्लेख कैसे किया ? क्या बिना लिपी का ग्रंथ संभव है ? वेद , वेदांगे और उपनिषद बिना लिपी के थे ? उनको ग्रंथ कैसे कहा जाये ? अगर लिपिका निर्माण सम्राट अशोक काल मे हुआ तो राजा अशोक उनका पुत्र और पुत्री कितनी लिखी पढि थी ? अगर उनके समय लिपी थी तो उन्होने 84 हजार स्तुपो के साथ 84 हजार पाठशाला क्यों नही निर्माण किया ? ग्रंथ के अनुसार राजा अशोक ने तिसरे संगायन इ. स. पूर्व 260 , 253 , 246, 242 , 218.संदर्भ - अभिधम्म पिटक पृष्ठ. क्रं.20 , 109 विनय पिटक पृष्ठ. क्रं.60 गौतम बुद्ध चरित्र- कृष्णराव अर्जुन केळुसकर. पृष्ठ. क्रं.170 , 171 ( कोई एक निश्चित नही है ) मे हुआ था तो उस समय त्रिपीटक क्यों नही लिखे गये थे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर कहते है , *पहिली गोष्ट ही की , सूत्तपिटक लिहिण्याकरिता बुद्धाच्या मृत्यूनंतर चारशे वर्षाचा काळ लोटला होता संदर्भ - खंड.20 पृष्ठ. क्रं.391 दुसरी ओळ आणि तिसरी ओळ.
भारतात आणि भारताबाहेर बौद्ध संस्कृती जिवंत आहे हे आपले म्हणणे जर खरे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून हे काय म्हणतात ते पहा -
आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये सिलोन आणि ब्रह्मदेश ही दोन राष्ट्रे बौद्ध धर्माभिमानी या दृष्टीने बरीच आघाडीवर आहेत असे दिसते परंतु माझ्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्राची बौद्ध धर्माच्या प्रचाराची कार्य अगदीच वाखण्याजोगी नाही
संदर्भ – खंड.18 भाग – 3. पृष्ठ. क्रं.412 पैरा – 3.
परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सिलोन मध्ये धम्म प्रचार कसा अनुभव आला त्याबद्दल ते काय म्हणतात ते पहा -
मी एकदा गेलो होतो.भिक्खु कसा काय धर्मप्रचार करतात हे मला अवलोकन करायचे आहे असे मी तेथील लोकांना सांगितले. त्यांनी मला सांगितले की , त्यांच्याकडे " दान " ही पद्धत आहे. नंतर मला समजले की , " वणाक " या अर्थाने दान या शब्दाचा उपयोग केला जातो. त्यांनी मला अकरा वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी नेले. तेथे टेबलाच्या आकाराची एक चौरस वस्तू होती. थोड्या वेळात एक भिक्खू आले. बऱ्याच उपस्थिती स्त्री-पुरुषांनी पाणी घेऊन त्यांचे पाय धुतले. नंतर ते चौरंगावर बसले. त्यांच्याजवळ हवा करण्यासाठी एक हात पंखा होता. ते काहीतरी पुटपुटले. पण काय पूटपुटले ते एका ईश्वरालाच ठाऊक ! अर्थात त्याने ते धम्म प्रवचन सिंहली भाषेत केले असावे. पण ते सुद्धा केवळ दोन मिनिटेच.! त्यानंतर ते निघून गेले
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.552 पैरा – दुसरा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारानुसार अंतरिक्षातील देव बुद्ध ही घोषणा , ब्रह्म लोकातून आलेला ब्रह्मसंहपती , पटीसेनचा भिक्षापात्र धरलेला हात व्यासपीठाच्या खोलीत दिसू लागला , बुद्ध वैशाली नगरात पोहोचताच विजेच्या गडगडात सह वर्षा होणे अशा अनेक चमत्कारिक घटना ज्या सूत्तपिटक मध्ये दिलेले आहेत. त्या विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात काय ?
म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या धम्मावर आपले मत व्यक्त करताना म्हणतात -
भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे. असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भभवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले ईस्टनिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं.169 अनु. क्रं.8 प्रकरण – 2..
ध्यान, चिंतन अभीधम्म कसे घातक व हानिकारक आहे याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे लिखित स्वरूपातील विधान पहा -
भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचा ग्रंथ तयार करताना त्यांच्या सामाजिक व नैतिक शिकवणुकीवर भर देण्याची काळजी घेतली पाहिजे. मला त्यांच्या या शिकवणुकीवर भर देण्याची आवश्यकता वाटते. कारण यावर भर न देता ध्यान , चिंतन , अभिधम्मावरच अधिक भर दिला जातो. भारतीयांसाठी अशा प्रकारे बुद्ध धम्माला प्रस्तुत करणे आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी हानिकारक ठरु शकतो.
संदर्भ – खंड.18 भाग – 3. पृष्ठ. क्रं.508 पैरा – 3.6 ( i ).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ध्यान आणि चिंतन आणि अभिधम्मपिटक स्पष्टपणे नाकारले आहे.
( टीप – सदर लेखातील मी दिलेले सर्व संदर्भ आद. माणिक वानखेडे सर ह्यांच्या लिखाणातून सादर केलेले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत