दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

वंचित बहुजन आघाडीला सामावून न घेणे, B टीम म्हणणे आणि अकोल्यात उमेदवार देणे ही फार मोठी चूक – समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांचे शरद पवारांना पत्र

प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करून आजवर केलेल्या चुकांचे पापक्षालन करावे

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करून आजवर केलेल्या चुकांचे पापक्षालन करावे असा भरदस्त आहेर करणारे पत्र शरद पवारांना प्राप्त झाले आहे. बहुजनांची सत्ता यावी यासाठी प्रामाणिक कष्ट घेणारे प्रकाश आंबेडकर यांना सामावून न घेता त्यांनी काँग्रेस ला पाठिंबा दिला असताना अकोल्यात त्यांच्या विरोधात आपण संघ भाजपा च्या विचारसरणीचा उमेदवार देणे आणि भाजपा ची B टीम म्हणून हिनवणे हे फार चुकीचे आहे असा स्पष्ट आरसा दाखवणारे पत्र आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी शरद पवार यांना पाठवले आहे.

निवडणुकी च्या माध्यमातून जातीयवादी संविधान विरोधी शक्तींना थोपवण्याचे प्रयत्न देशभरात चालू असताना पुरोगामी महाराष्ट्रात मात्र त्यासाठीचे भरीव प्रयत्न राजकीय पक्षा कडून दिसत नाहीत अशी खंत व्यक्त करणाऱ्या आशयाचे आणि “कथनी आणि करणी मध्ये फरक आहे” हे दाखवून देणारे हे पत्र आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातीलअनेक जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर आंबेडकरांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यासह काँग्रेसच्या काही उमेदवारांना वंचित पाठिंबा देईल, असंही आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.

मात्र महाविकास आघाडीने अकोल्यात प्रकाश
आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमधील एका पक्षाच्या प्रमुखांने यावर नाराजी व्यक्त करत मविआचे प्रमुख नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करू नये यासाठी शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) आणि उद्धव ठाकरे (ठाकरे गटाचे प्रमुख) यांना प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांनी पवारांना पत्र लिहून काँग्रेसच्या उमेदवाराविरोधातही नाराजी व्यक्त केली आहे.

अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील हे संघी बाजपी विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील

अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!