
पुणे – डॉ बाबासाहेब यांनी विजय स्तंभला 1 जानेवारी 1927 भेट दिली त्यावेळी भीमा कोरेगाव ही जगात एकच समतेची लढाई झाली असल्याचे
सांगून पेक्षावाई संपवली म्हणून महार बाटलीयनचे अभिनंदन केले होते,संभाजी महाराजाचा खून मुस्लिम ने केला तरी त्याला मदत पेक्षावाईची होती,त्याचा राग महार म्हणून भीमाकोरेगाव केले होते,तीच मानसिकता आता थोड्या फरकाने आहे, परभणी व बीडची घटना झाली,बाबासाहेब यांची क्रांती संपविण्याचे कारस्थान चालू आहे.गृहमंत्री यांनी बाबासाहेब यांचा अपमान केला तर भारत भर निषेध करून त्याची जागा दाखवून दिली आहे.तडीपार गृहमंत्री कमी करा नाही तर तुम्हाला कधीच राजकीय आश्रय देणार नाही,अपमानाचा जशास तसा धडा शिकावीला पाहिजे, गद्दारांना संपवने गरजेचे असून डॉ बाबासाहेब यांच्या संस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि आर पी आय चालवावी लागेल, वाढवावी लागेल क्रांतीचारथ पुढे न्यावा,व्यवस्थेविरुद्ध पुढील पिढी साठी 2014 पासून आपल्या क्रांती विरुद्ध प्रतीक्रांती चालू आहे ते थोडया प्रमाणात यशस्वी झाले आहेत, ही क्रांती लेखणीने व मतदानातून लढावी लागेल, आपला मित्र कोण व शत्रू कोण ओळखला पाहिजे नवीन जोडले पाहिजे,स्वाभिमान घेऊन जा,आपली शूरता कायम ठेवील पाहिजे असे सरांवशाने असे प्रतिपादन 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमात डॉ. भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल ) यांनी केले. संस्थेचे रिपोर्टिंग टेस्टी चेअरमन एडवोकेट सुभाष जोंधळे यांनी संघटन व वैचारिक कार्यकर्ता समाजात असणं खूप गरजेचे आहे असे सांगितले, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर अँड एस के भंडारे यांनी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाच्या वतीने डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध गया महाबोधी महाविहार,महू डॉ बाबासाहेब जन्मभूमी, नागपूर दिक्षाभूमी या बौद्धाच्या ताब्यात घेणे, संविधानाच्या माध्यमातून दिलेले समतेचे हक्क व अधिकार, सोयी सुविधा घालवीण्याचे काम चालू आहे त्या विरुद्ध संविधान समर्थक समाज जोडो अभियान वर्षभर संपूर्ण भारतभर सुरु करण्यात आले असून जर ते केले नाही तर पूर्वीप्रमाणे सांकेतिक दृष्टया पुन्हा गळ्यात मडके आणि पाठीला खराटा येईल असे प्रतिपादन केले, यावेळी बुद्ध गया महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्याच्या आंदोलनाचे आकाश लामा यांनी डॉ भीमराव य आंबेडकर यांना बुद्ध गया आंदोलनाचे नेतृत्व करावे असे आवाहन केले.कर्नाटक राज्यअध्यक्ष मनोहर मोरे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यु जी बोराडे यांनी शौर्यदिनानिमित्त अभिवादन व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष अरविंद सोनवणे, प्रास्ताविक पुणे जिल्हा पूर्व च्या महिला अध्यक्षा सुजाताताई ओव्हाळ, सूत्रसंचालन मेजर राजरतन थोरात पुणे जिल्हा पूर्व सरचिटणीस,स्वागत व आभार पुणे जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष संतोष आरवडे यांनी केले.
प्रथम विजय स्तंभला समता सैनिक दलाच्या वतीने मुंबईच्या बँड पथकासहित डॉ भीमराव य आंबेडकर, अँड सुभाष जोंजाळे व अँड एस के भंडारे यांनी पुष्पचक्र अर्पण करण्यात येऊन दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम,दादासाहेब भोसले हेडकॉटर सचिव डीएम आचार्य,लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे इत्यादी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातील1000अधिकारी,सैनिक यांनी एक जानेवारी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ड्युटी/ सेवा दिली.
या शौर्य दिनाच्या कार्यक्रमास पुणे महानगर जिल्ह्याचे सरचिटणीस एडवोकेट सुधाकर सरदार, कोषाध्यक्ष दिलीप कांबळे व रवींद्र बाराथे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राधाकांत कांबळे, कुणी पश्चिमचे सरचिटणीस भगवान शिंदे, पुणे पूर्वच्या स्मिताताई भिंगारे, पुणे पश्चिम च्या महिला सरचिटणीस प्रज्ञाताई आगळे, पुणे जिल्हा पूर्वचे संस्कार उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड पुणे जिल्हा पूर्वचे प्रचार उपाध्यक्ष वामन वाघमारे, पुणे जिल्हा प्रवचन संरक्षण उपाध्यक्ष अनिल सोनवणे व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, पुणे जिल्हा पूर्व, पुणे जिल्हा पूर्व महिला,पुणे पुणे महानगर जिल्हा व महिला, तसेच शहर,तालुका शाखा पूर्व हवेली ग्राम शाखा पेरणा फाटा यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत