दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

उद्योजक राष्ट्रपिता महात्मा फुले.

महात्मा फुले ही आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे (Pune commercial & contracting Company) कार्यकारी संचालक होते.

एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, आणि अर्थतज्ज्ञ या त्यांच्या योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही.

जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले.

‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते.

जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत.

महात्मा फुलेंचे निकटवर्तीय सहकारी स्वामी रामय्या वेंकय्या अय्यावारू आणि जया कराडी लिंन्कू हे ही पुण्यासह मुंबई येथे बांधकाम क्षेत्रात उतरले त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाची इमारत तसेच सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते असणारे राजू बाबाजी वंजारी यांनी सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण महात्मा फुलेंचे निकटचे स्नेही आणि कार्यकर्ते होते तसेच या सर्व सहकाऱ्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे.

जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते ते खर्च करत असत.

जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ या नावाने प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र ही होते.

सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.

अशी कितीतरी कामे या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

१८८८ मध्ये मुंबईत जोतिराव फुले यांचा रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि याच कार्यक्रमात त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.

अशा या थोर महात्म्यास जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!