इंग्रजी येण्यापेक्षा लोकांच्या समस्या समजणे व प्रभावीपणे मांडणे जास्त शहाणपणाचे : लंके यांचे सुजय विखेंना तडाखेबाज प्रत्युत्तर

अहमदनगर : उच्चशिक्षित डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या इंग्रजी आणि हिंदी भाषेबद्दल जाहीर सभेत दिलेल्या अहंकारी आव्हानाला निलेश लंके यांनी तडाखेबाज प्रत्युत्तर दिले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना लंके म्हणाले, ‘माझ्या समोरच्या उमेदवाराने इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे’.
‘इंग्रजीतून बोलणे महत्वाचे नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसदेत मराठी माणसाचा आवाज उठविला. आपल्या जिल्ह्यातील दिवंगत नेते बबनराव ढाकणे यांचेही शिक्षण कमीच होते. त्यांनी बीडचे जिल्ह्याचे नेतृत्व करताना संसदेत मराठीचा झेंडा लावला होता’ असा इतिहास सांगून सुजय विखे यांना लंके यांनी आरसा दाखवला.
स्वतःला खूप हुशार समजणाऱ्या आणि पक्ष फुटीतून भाजपा मध्ये गेलेल्या विखेना यापूर्वी ही जनतेने भर सभेत” इतके दिवस कुठे होतात?” असे सुनावले होते. हा केवळ पैशाचा सत्तेचा आणि अहंकाराचा माज आहे असं मत जनतेतून व्यक्त होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत