महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मुंबईतील ब्रिटिशकालीन फळबाजार हटवणार, ९८ वर्षे जुन्या रेल्वे पुलाच्या उभारणारीसाठी निर्णय

भायखळा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाला ९८ वर्षे पूर्ण झाली असून, तो धोकादायक झाल्याने नवा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. या पुलाच्या आराखड्यात येणाऱ्या संत गाडगे महाराज भाजी मंडईतील फळ बाजार हटवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
भायखळा मंडई ८,३०९ चौरस मीटर जागेत विस्तारलेली आहे. मंडईत एकूण ५३३ परवानाधारक विक्रेते आहे. एकूण सहा रांगा आणि एक कोथिंबीर ओटा आहे. त्यापैकी सी आणि एफ रांगेत फळांची विक्री होते. फळविक्रेत्यांची संख्या १४० आहे. यापैकी ४० फळविक्रेत्यांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. स्थलांतरित फळविक्रेत्यांना मंडईतच तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात आली आहे. पूल उभारणीच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!