महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

प्रज्ञेचा प्रदीप लावल्यास मनुष्याच्या जीवनातील अंधःकार नष्ट होतो..! – भिक्खू महावीरो थेरो


लातूर : बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्ट, लातूर द्वारा आयोजित फाल्गुन पौर्णिमा निमित्त धम्मदेशना व सत्कार कार्यक्रम प्रसंगी भिक्खु महाविरो थेरो (काळेगाव) यांनी प्रतिपादन केले.

आपल्या मौलिक धम्मदेशनेत म्हणाले की, प्रत्येक मनुष्याने जीवन जगत असताना शील पालन करणे आवश्यक आहे,असल्याचे आपल्या धम्मदेशनेत सांगितले.
सदरील कार्यक्रमात मा.प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त मा. श्रीहरी कांबळे, मा.सुरेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.पूज्य.भिक्खू महाविरो थेरो (काळेगाव) ,भिक्खू पय्यानंद थेरो ,श्रामनेर बुद्ध शील ,श्रामणेर विपस्सी आदी भिक्खु संघास उपा. वैशाली गायकवाड, प्रांजली गायकवाड, मंगल ताई कांबळे ,शोभा बामणीकर यांनी चीवरदान केले.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा धम्म गुरू भिक्खू पय्यानंद थेरो यांनीही आपल्या मंगल वाणीतून उपस्थितांना धम्मदेशना दिली. मनाची शुद्धता हीच जगातील महान शुद्धता आहे म्हणून प्रत्येकानी विपश्यना करावी, विपष्यनेचे तंत्र / टेक्निक अवगत करावे. जीवनाचे ,मनाचे बॅलन्स ठेवण्यासाठी काया-वाचा- मनाने पुण्य कर्म व नीतिमत्ता ,सद्गुण अर्जित करावे.मनच माणसाच्या सुगतीला व दुर्गतीला कारणीभूत असते.म्हणून येणाऱ्या काही दिवसात महाविहार सातकर्णी येथे वन डे मेडिटेशन, दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आदी उपक्रम राबविले जाणार आहेत असेही ते म्हणाले.कार्यक्रमात थायलंड हे बौद्ध राष्ट्रा पाहून आलेल्या उपासक-उपासिकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मिलिंद धावरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. दुष्यंत कठारे यांनी मानले व कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपाल गाथा व आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!