निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हा राजकीय आखाडा आहे….!!

२०२४ ची लोकसभा निवडणुक आहे. महाराष्ट्रात राजकीय आखाडा सजला आहे…!!
प्रस्थापित राजकीय पक्ष, प्रस्थापित ऊच्च वर्णिय,आणि जात दांडगे तसेच त्यांच्यांच हातातील मिडिया यांनी मिळून ठरविले आहे की, २०२४ ची लोकसभा निवडणुक ही दोनच धृवावर झाली पाहिजे म्हणजेच. महायुती × मविआ असा हा आखाडा सजवला गेला आहे….!!

एका बाजूला मनुवादी विचारांची महायुती आहे….!!
महायुती मध्ये महादेव जानकर यांचा रासप.
रामदास आठवले यांचा रिपाइं (ए).
बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष.
सदाभाऊ खोत यांचा जनशक्ति.
जोगेंद्र कवाडे यांचा पिरीपा.
असे छोटे छोटे मात्र दखलपात्र दलित, ओबीसी समुहाचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत परंतु त्यांना कुणीही विचारत नाही, त्यांची कुठचं चर्चा नाही, त्यांना कुणी किती जागा देणार हेही कधीच चर्चेला सुद्धा घेतले जात नाही, याचा सरळ अर्थ असा होतो की, या दलित, ओबीसी पक्षाच्या प्रमुखांना मतांसाठी वापरुन घेतले जाते आहे,सत्तेतील वाटा दिला जात नाही….!!
मात्र विशेष नोंद घेण्यासारखी बाब अशी की, राज ठाकरे यांच्या मनसे ने २०१४ च्या निवडणुकीत १.५ टक्के म्हणजे दिडटक्का मते घेतली होती आणि २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारच ऊभे केले नव्हते म्हणजे त्यांची ताकदच माहित नाही तरीही तो पक्ष सवर्णांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून राज ठाकरे यांना दिल्लीला बोलावून बोलणी करुन योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल हे धूमधडाक्यात सुरू आहे…!!

दुसऱ्या बाजूला सरंजामी वृत्ती ची मविआ आघाडी आहे…!!
मविआ चे सहकारी म्हणून
राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना.
संभाजी ब्रिगेड.
अबू आझमी यांचा समाजवादी पार्टी.
वंचित बहूजन आघाडी .
हे वंचित, शेतकरी, अल्पसंख्याक मुस्लिम,गरीब मराठा यांचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष आहेत…!!
मात्र मविआ मधील प्रस्थापित राजकीय पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनच राजकीय पक्षात वाटाघाटी करीत आहे…!!
छोट्या पक्षांना वा-यावर सोडून दिले आहे.
शेतकऱ्यांची, वंचितांची, अल्पसंख्याक मुस्लिम समुहाची,गरीब मराठ्यांची मते घ्यायची त्यांना वापरून घेण्याचं धोरण ठरवितं आहेत.मात्र सत्तेतील वाटा देण्यासाठी तयार नाहीत….!!

      या दोन्ही आघाड्याच्या बाहेर असलेले जसे एमआयएम , बीआरएस, ओबीसी बहुजन आघाडी(प्रकाश शेंडगे.)हे पक्ष  आहेत. त्यांनाही कुणीचं विचारत नाहीत....!! 

                    सारासार विचार करता असे लक्षात येते की, दोन्ही महायुती आणि मविआ मधील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या धुरीणांनी ठरविले आहे की, इथल्या दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, आदिवासी,शेतकरी,गरीब मराठा, आंबेडकरवादी,समुहाची मते भुलथापा देऊन ओरबाळायची आणि सत्तेत जायचे...!! 

        प्रस्थापित राजकीय पक्षांची एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की, प्रस्थापित मुठभर असुनही बहुमताने सत्तेत कसे बसतात.? त्याचे अनुभवाने मिळालेले उत्तर असे आहे की,.... 
     प्रस्थापित राजकीय पक्ष बहुजनांना निवडणुकी पुर्वी भयभीत करीत असतात, त्यासाठी ते कधी धर्मिक, तर कधी जातिय दंगली घडवितात. कधी मुस्लिम खतरे असतो तर कधी हिंदू खतरे में असतो,आणि नेहमी सत्तेत मात्र सवर्ण बसतो...!! 

       आता मविआ ने संविधानवादी जनतेच्या मनात भिती निर्माण केली आहे, संविधान खतरे में आहे म्हणतो आणि आम्ही संविधान वाचविणार, लोकशाही वाचविणार असे नवे सोंग घेतले आहे. मविआ मधील प्रस्थापित पक्ष ढोंगी आहेत, त्यांनी अशी सोंग, ढोंग गेली ७३ वर्षात नेहमीच वठविली आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कृपया संविधानवादी जनतेने यांच्या ढोंगाला बळी पडू नये...!! 

   हा राजकीय आखाडा आहे इथे नितीमत्तेला बाजूला ठेवून राजकीय व्यवहार केला जातो. इथे न्यायाची कुणालाही चाड नसते. मिळेल तेवढे पदरात पाडून घ्यायचे असते म्हणूनच तर एका एका जागेसाठी भांडणं केले जाते...!! 

                 गांभीर्याने विचारात घेण्यासारखा मुद्दा असा आहे की, धनगर, गरीब मराठा, आंबेडकरवादी, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक मुस्लिम यांच्या हातात निवडणुकी नंतर काय मिळेल..?? 

       आज तुम्हाला भयग्रस्त करुन तुमची मते लूटली जातं आहेत आणि तुम्ही हतबल होऊन फक्त टि. वी. वरील बातमीवर विश्वास ठेवता आहात, मुठभर सवर्ण आपल्या हिताचं राजकारण करीत आहेत आणि तुमचे पंधरा राजकीय पक्ष असून तुम्ही भयग्रस्त आहात, हतबल आहात, निष्क्रिय आहात, सवर्णांसारखे सत्तेसाठी ऐकी का करीत नाही...??? 

                      शरद पवारांचा राजकीय पक्ष फुटला असे भासविले जाते मात्र, योगेंद्र, पार्थ आणि जय पवार हे तिन्ही नातू शरद पवार साहेबांनी राजकारणात प्लॉंट केले आहेत हे घराणेशाही वाल्यांची चिकाटी आहे. सत्तेसाठी बहुजनांनी अशी चिकाटी शिकली पाहिजे....!! 

  बहुजनांच्या सत्तेसाठी आपणं ऐकी केली पाहिजे असे  मनोमन वाटतेय...!! 
          महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते ऍ ऍड बाळासाहेब आंबेडकर हे एकटे या राजकीय आखाड्यात छड्डू ठोकून ऊभे आहेत...!! 
                          बहुजनांच्या हक्क आणि अधिकारासाठी १५ ओबीसी आणि ३ मुस्लिम प्रतिनिधी संसदेत गेले पाहिजे ही बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका आहे.म्हणजे लोकशाहीचे सामाजिकीकरण करणे हे धेय्य आहे...!!

एस. सी. राखीव आणि एस. टी. राखीव जागा आहेत परंतु ओबीसी आणि अल्पसंख्याक समुहासाठी राखीव जागा नाहीत म्हणून त्यांचा वाटा मिळविण्यासाठीचा हा संघर्ष आहे…!!
घराणेशाही वाल्यांनी ओबीसी आणि अल्पसंख्याक मुस्लिम समुहाचा वाटा हळप केला आहे तो वाटा मिळवण्याची ही लढाई आहे…!!
राजकीय आखाड्यात प्रबळपणे एक ताकद ऊभी करुन ऊभे रहावे लागते तेव्हा सत्तेच्या दालनात जाता येईल, भिक वाढं व माय म्हणून सवर्ण तुम्हाला सत्तेचा वाटा देणार नाहीत, गेली ७३ वर्षे दिला नाही, आजही देण्याची त्यांची तयारी नाही म्हणून तर दोन्ही महायुती आणि मविआ मध्ये एका एका जागेसाठी आपसात भांडू लागले आहेत.त्यांनाच कमी पडतेय तुम्हाला कोठून देणार…???

तुम्ही स्वबळावर मिळविले पाहिजे हाच निकष आहे….!!

तुम्ही हतबल न होता लढले पाहिजे हेच योग्य आहे…..!!

मिडिया मार्फत तुम्हाला भयग्रस्त केल्या जात आहे तुम्ही खचू नका….!!
मृगजळाच्या पाठिमागे लागून काहीही साध्य होणार नाही…!!

युती किंवा आघाडी मध्ये आम्ही मोठे होऊ या भ्रमातून बाहेर पडा….!!
तुर्तास एवढेच.
जयभीम.
@.. एकत्र आले तरच सर्व बहुजनांना न्याय मिळेल,नाही तर तुमचे मूळ बाळ, रस्त्यावर येतील,पशु पक्षी एकीने राहतात,तुम्ही तर माणस आहेत रे बाबा हो,नाही तर भविष्य खूप वाईट आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!