निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

निवडणुकीच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्याना, उमेदवाराला विचारा हे अत्यावश्यक प्रश्न !- आयु. इ झेड खोब्रागडे.

लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि16 मार्च 2024 ला निवडणूक आयोगाने घोषित केला. 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जून ला निकाल आणि 16 जून चे आत नवीन सरकार स्थापन होइल.

समाजातील सर्वसामान्य, शोषित- वंचित-उपेक्षित- दुर्लक्षित दुर्बल घटक, अल्पसंख्यांक , महिला व युवा यांच्या विकासा साठी मागील वर्षात सरकारने काय केले, आणि या वर्षात ,पुढील पाच वर्षात काय करणार आहेत यावर राजकीय पक्ष व नेते तसेच उमेदवार यांना प्रश्न विचारावे ,शपथपत्र मागावे

विषय आपल्या जीवनाशी निगडित असतील, क्षेत्रीय असतील.
1.शिक्षण , शाळा, शिष्यवृत्ती, हॉस्टेल ची सोय व त्यावरील बजेट आणि खर्च.
2.आरोग्याची व्यवस्था, दवाखाने, डॉक्टर्स , औषधी ची सोय
3. उपजीविका ,रोजगार, नोकरी, छोटेमोठे व्यवसाय साठी अर्थसहाय्य, जागा उपलब्ध व मदत,
4. वस्ती मध्ये सेवा सुविधा, पाणी, विद्युत, रस्ते, पक्की घरे, चांगला परिसर व पर्यावरण
5. मूलभूत गरजा-अन्न- वस्त्र- निवारा सह , जागेचे मालकी हक्काचे पट्टे, , शेती जमिनीची मालकी पट्टे, रेशन कार्ड्स , जातीचे दाखले मिळणे , सुरक्षित जीवन जगणे असे अनेक प्रश्न आहेत.

अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, पारधी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक , महिला ,युवा वर्गासाठी वार्षिक बजेट मध्ये तरतूद किती, किती खर्च केली, किती कुटुंबांना /व्यक्तींना फायदा झाला, किती कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली.

जातीय अत्याचार थांबण्याऐवजी कां वाढलेत ?, आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा का करण्यात आला? मागील 10 वर्षात सेवेत आरक्षणाचा फायदा किती लोकांना देण्यात आला.?

शासन प्रशासनातील भ्रष्ट्राचार आणि सर्वसामान्यांची पिळवणूक का थांबली नाही?, शासकीय कार्यालयात आम्हाला सन्मान का मिळत नाही? ,अधिकारी कर्मचारी संवेदनशीलतेने का वागत नाही,?शोषित वंचितांच्या वस्तीत अधिकारी का येत नाही?, इत्यादी. बाबत प्रश्न विचारले पाहिजे.
बघा विचारून, काय प्रतिसाद मिळतो,? त्यावर ठरवावे की मागील 10 वर्षात, कोणी तुमची फसवणूक केली, लुबाडले, दिशाभूल केली, अपमानित केले , शोषण केले, वंचित ठेवले, जातीयवाद केला,? ज्यांनी भूलथापा दिल्यात, अन्याय केला, त्रास दिला त्यांना मतदान करू नका. वर्तमान सरकारने सर्व सामान्य लोकांचा, शोषित वंचित वर्गाचा विश्वासघात केला,. कॉर्पोरेट्स साठी काम केले, तिजोरी लुटली, electoral bond व अनेक घटनां सोशल मीडियात येत आहेत, त्यावरून म्हणता येईल. मोठे मोठे इव्हेंट्स केले, भ्रष्टचाराला प्रोत्साहन दिले,
भ्रष्टाचार म्हणजे देशाशी बेईमानी, देशद्रोह, असे सरकार नको. संविधानाने दिलेला मताचा अधिकार योग्य प्रकारे वापरा. भुलथापेला, आमिषाला बळी पडून चुकीचा लोकप्रतिनिधी निवडलागेला तर चुकीचे सरकार येईल आणि 5 वर्ष पश्चाताप करीत रहावे लागेल।
याबाबत दि 16 मार्च 2024 ला वंचितांच्या विकासाचा अजेंडा या कार्यक्रमात वरील मुद्यांवर चर्चा केली.

इ झेड खोब्रागडे,
संविधान फौंडेशन, नागपूर
दि 25 मार्च 2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!