डॉ. आंबेडकरांची धम्मक्रांतीच लोकशाही वाचवेल

संबोधी पुरस्काराचा शानदार सोहळा ….
– प्रा. गौतमीपुत्र कांबळे
संबोधी प्रतिष्ठानचा पुरस्कार हा बाबासाहेबांच्या प्रतिभेचाच सत्कार: सतीश कुलकर्णी
वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाचे निवृत्त सहाय्यक संपादक, विज्ञान विभाग प्रमुख आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुलकर्णी यांना संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षीचा १५ वा पुरस्कार कृतिशील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा . गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या शानदार सोहळ्यात बोलताना ते म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व त्यांनी देशात केलेली बौद्धधम्म क्रांतीच भारतीय लोकशाहीला वाचवेल.
विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे ,उपाध्यक्ष रमेश इंजे ,कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ,प्रा. प्रशांत साळवे , डॉ.सुवर्णा यादव, कॅप्टन बनसोडे यांच्या पत्नी यमुनाताई व यशपाल बनसोडे उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सतीश कुलकर्णी यांची कन्या प्रतिष्ठा सोनटक्के व ग्राम विकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल पुनम केशवराव कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाई येथील रा.ना.चव्हाण प्रतिष्ठानचे प्रमुख रमेश चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, सध्या देशात चांगले वातावरण नाही. मला काय त्याचे पडले आहे ,असे म्हणून गप बसून चालणार नाही.ते बदलण्यासाठी प्रत्येकानेच प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे येण्याची नितांत गरज आहे.
सेक्युलॅरिझम म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे तर सार्वजनिक हित आणि आरोग्याच्या आड येणाऱ्या प्रथा परंपरेचा बंदोबस्त करण्याचा अधिकार संविधानाने राज्य शासनाला दिलेला आहे. त्याचे योग्य प्रकारे पालन होताना दिसत नाही.
आज धर्माच्या आणि सर्वच जातींच्या अस्मिता तीव्र झालेल्या आहेत. हाच खरा स्वातंत्र्य, समता ,बंधुता आणि लोकशाहीच्या विरोधी असलेला व विषमता आणि गुलामगिरी जोपासणारा ब्राह्मणीईझम आहे .तो गाढण्याची गरज आहे. केवळ ब्राह्मणांना शिव्या देऊन हे होणार नाही तर आपली जात अस्मिता सोडण्याची गरज आहे.
पुरस्काराचे मानकरी सतीश कुलकर्णी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आंबेडकरवादी समाज व विचाराशी माझे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. ते मी आणि
नुकतेच निधन झालेली माझी सहचारिणी प्रज्ञाने निष्ठेने जपलेली आहे. तेच माझे खरे बळ आहे. मला मिळालेला संबोधी प्रतिष्ठानचा पुरस्कार हा डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि प्रतिभेचाच सत्कार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत