महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग १०३


भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा

भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धान्त खरा ठरला आहे.” (transitoriness)
विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की, विश्वाची गती संधीकरण, विभाजन, आणि पुनर्संधीकरण ह्या प्रक्रियांनुसार होत असते. अणूंचे सूक्ष्म कणांत विभाजन झाले आहे. धनविद्युत् जागृत असे धनविद्युत्कण (protons) व ऋणविद्युत् जागृत असे ऋणविद्युत्कण (electrons). निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना (fixed unalterable mass) विज्ञानास कायमची अंतरली. चालू शतकात जगात असा समज आहे की, प्रतिक्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे. आधुनिक विज्ञानाचा विचारप्रवाह म्हणजे अन्तिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता ह्यांची प्रवृत्ती. The trend of modern science is the trend of ultimate reality, unity and diversity of ego. आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्धधम्मातील अनित्य आणि अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय. (transitoriness and egolessness) श्री. इ. जी. टेलर आपल्या ‘बौद्धधर्म आणि आधुनिक विचारधारा’ (Buddhism and Modern Thought) ह्या ग्रंथात म्हणतात:
“बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजविला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत, सभ्य (truely civilised) व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्त्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्धधम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचारपद्धती आहे की, जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे. ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्धधम्माची आवश्यकता आहे.”
यूनिटेरिअन मिनिस्टर, रेव्हरण्ड लेस्ली बोल्टन म्हणतात:
“बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हीच धम्माची फार सामर्थ्यशाली देणगी आहे, असे मला दिसते. बौद्धधम्माप्रमाणे यूनिटेरिअन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात. यूनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत, असे मानतात.”
प्रा. ड्वाइट गोडार्ड म्हणतात:
“जगातल्या सर्व धर्मसंस्थापकांत भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते, की जे कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर असा खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल. त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणीतरी संस्थापित करून त्याला तुच्छ व हीन न ठरवता प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर (त्याला) प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे.”
बौद्धधर्म” (Buddhism) या ग्रंथाचा लेखक ई. जे. मिल्स म्हणतो:
“बौद्धधम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही.”
प्रा. डब्लू. टी. स्टेस आपल्या ‘बौद्धधर्मीय नीतीशास्त्र’ (Buddhist Ethics) या ग्रंथात म्हणतात:
“बौद्धधम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे.” (morally and intellectually great) तो तत्त्वज्ञ तसेच सदाचारीही असला पाहिजे. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत. त्यांपैकी अज्ञान हे एक आहे, असे बौद्धधम्माने आग्रहपूर्ण सांगितले आहे (तृष्णा किंवा लोभ हे दुसरे). जगातल्या दुःखांपैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा मूर्खपणामुळे आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. भगवान बुद्धांनी या गोष्टींना (मूर्खपणा व अंधश्रद्धा यांना) मुळीच स्थान दिले नाही.”
बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व, एकमेवाद्वितीय आहे हे स्पष्ट करण्यास एवढेसे पुरेसे आहे. असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही?
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२५.३.२०२४
मो.९३२६४५०५०६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!