महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

जोतिबांच्या कार्याची अपुर्वता-जागर – २…राजाराम सूर्यवंशी

दि.२१ मार्च २०२४. जागर – २…राजाराम सूर्यवंशी

 जोतिबांचा दुसरा उन्मेष " मुलींची शाळा " हा होता. तो पुणे शहर व जोतिबांपुरता आश्चर्यकारक होता . तसेच तत्कालीन  पुण्यातील सनातन्यांची  दहशत पाहता अपुर्व होता .

     पुण्याबाहेर महाराष्ट्रात अन्यत्र मुलींच्या शाळा जरुर निघाल्या होत्या . मुंबई व कोकणपट्टीत मुलींच्या शाळा पुण्याआधी  निघाल्या होत्या हे सत्य आहे . परंतु त्या सर्व शाळा अमेरिकन मराठी मिशनने काढल्या होत्या ही बाब लक्षात घेतली पाहिजे ,  

दुसरे कारण ,पुणेच्या तुलनेत मुंबई ही सर्वसमावेशक व जातीभेदाचा अंमल पुण्याएवढा कर्मठ नसलेली शहरे होती . कारण पुण्याची पेशवाई सिंधूबंदीमुळे कल्याण -डोंबिवलीच्या पुढील आरबी खाडी ओलांडून मुंबईत गेलीच नव्हती.

 पाठारे प्रभू व कोकणातील कऱ्हाडे ब्राह्मण तसेच कायस्थ या ब्राह्मण्यविरोधी जातींचे प्राबल्य मुंबई व कोकण किनारपट्टीवर होते .त्यात भर अमेरिकन मराठी मिशन  व स्काॕटिश  मराठी मिशन या  मिशनऱ्यांची होती .त्यांचाही प्रभावाखाली मुंबई व कोकणपट्टीत सारख्या जातीविहीन प्रदेशावर होता . जोतिबांच्या आगोदर अर्थात पुण्याचा आगोदर मुलींच्या येथे उभे राहणे , शाळा सुरु होणे यात म्हणून आश्चर्य नव्हते .ते आश्चर्य जोतिबांनी पुण्यात उघडलेल्या मुलींच्या शाळेचे होते .

   सरोजिनी  नायडू यांनी " मिशनऱ्यांची मराठी सेवा " या पुस्तकात नमूद केल्या प्रमाणे  मुंबईत मुलींची शाळा १८२४ साली निघाली होती व ती सुध्दा अमेरिकन  मराठी मिशनच्या सिंथिया फॕरार यांनी काढली होती . ही शाळा भायखळ्याला होती . त्यामुळे केवळ मुलींची शाळा यात अपूर्वाई नव्हती .

    पुण्यात एखाद्या ब्राह्मणाने मुलींची शाळा काढली असती तर तिचेही कौतुक नव्हते .परंतु एकाद्या ब्राह्मणेतराने वा अब्राह्मणाने पुण्यासारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात मुलींची शाळा काढावी हि त्या शाळेची व जोतिबांच्या कार्याची अपुर्वता होती .

म्हणून जोतिबांचे कार्य प्रत्येक बाबतीत दिशा दिग्दर्शक ठरले होते . मागील अनेक पिढ्यांचा अंधःकार त्यानी लावलेल्या ज्ञानज्योतीने उजळून निघत होता. त्यांचे असे महान कार्य पाहता महात्मा जोतिराव फुले हेच आमचे प्रथम राष्ट्रपिता ठरत होते . नव्हे महात्मा फुले हेच आमचे राष्ट्रपिता होते .

              येथे एक खास बात नमूद करावीशी वाटते जी डाॕ.मा.गो.माळी संपादित  " सावित्रीबाई फुले :कार्य व कर्तृत्व" या पुस्तकात नमूद केली आहे , ती ही की , मिसेस विल्सन नावाच्या स्काॕटिश मराठी मिशनच्या एका जिद्दी महिलेने सरकारच्या परवाणगीने पाच-सहा वयोगटातील मुलींसाठी शनिवारवाड्यात एक प्लेग्रुपसारखी शाळा चोरुन-लपून काढली होती . यात मुली फक्त सात/आठ होत्या .  त्या   खेळत खेळत शनवार वाड्यात येत व एका तासानी खेळत खेळत निघून जात  . अधून मधून या मुली येथे येत असत . मिसेस विल्सन त्यांना गोळ्या ,बिस्किट देत असत. काही मराठी गाणं शिकवत  असत. परंतु पुण्यातील सनातन्यांना ही एवढी गोष्टही सहन झाली नाही . व त्यांनी मिसेस विल्सन यांना शनवार वाड्यात येण्यापासून रोखले  आणि काही महिन्यातच ही शाळा बंद पडली .

या पार्श्वभूमीवर जोतिबांच्या कार्याची अपुर्वता  अजून उजळून निघते हे नक्की.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!