महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

शक्तिहिन (MVA) महाविकास आघाडीला कशाचा अहंकार- माज आहे ?

सुरेश रा शिरसाट, अकोला.
बेरजे ऐवजी वजाबाकीचे राजकारण करून महाविकास आघाडी मोदीशा -भाजपाचा मुकाबला कशी करणार ?“““““
अहंकारी महाविकास आघाडी _
लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.19 एप्रिल पासून निवडणूकीचा पहिला फेज सुरू होत आहे.निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.मात्र मोदीशा -भाजपाचा पराभव करून ” इंडिया आघाडीचा पंतप्रधान ” करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंडिया आघाडी अर्थात राज्यातील महाविकास आघाडी एवढी अहंकारी का झाली आहे ? राज्यात बेरजेचे राजकारण करत असलेल्या भाजप प्रणित महायुतीचा मुकाबला महाविकास आघाडी वजाबाकीचे राजकारण करून मोदीशाना 400 पार च्या उद्दीष्टावर शिक्कामोर्तब करू इच्छिते का ? असा सवाल आता निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचेकडे दखलपात्र विजयाकडे नेणारे 9 ते 10 टक्के मते असताना महाविकास आघाडी त्यांना सामावून घेण्याऐवजी दूर सारते आहे. त्यांचीशी चर्चा सुध्दा करत नाही. नियमित बैठकींना बोलावत नाही.बोलावले तर धड त्यांचीशी चर्चा करत नाही ? एवढा माज ? एवढा माजोरीपणा ? एवढा प्रचंड अहंकार महाविकास आघाडीच्या नेत्यांना कशाचा आणि कशापायी आहे ? “सुंभ जळाला तरी पिळ जात नाही !! “अशी MVA ची अवस्था आहे. हालत पतली आहे. हरणारी आहे. परंतु बडेजाव राजेशाही आहे.बाळासाहेब आंबेडकरांप्रती MVA नेत्यांची भावना संकुचित आणि तुच्छतेची आहे.उद्या MVA हारली तर संपूर्ण दोषारोप बाळासाहेब आंबेडकरांवर करून MVA मोकळी होणार आहे.

● शरद पवार व उध्दव ठाकरे यांचे मिडीयातील स्टेटमेंटने महिनाभर वंचितला खेळवले.

केवळ मिडीयातून बोलायचे.प्रत्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधी असो किंवा नेते बाळासाहेब आंबेडकरांशी कुठलाही आश्वासक संवाद महाविकास आघाडीने प्रस्तावित केला नाही तो आजपर्यंत.

महिण्याभऱ्यापुर्वी असेच एक स्टेटमेंट वंचित संदर्भात शरद पवारांनी केले होते. ते म्हणाले होते की, वंचित बहुजन आघाडीला 5ते 6 दिल्या पाहिजे कारण तेवढी त्यांची राज्यात ताकद आहे. यालाच अनुसरून उद्धव ठाकरे यांनी सुध्दा शरद पवारांच्या स्टेटमेऔटला दुजोरा दिला होता. परंतु निर्णय प्रकियेत असणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या बैठकीत किंवा वंचितच्या प्रतिनिधींना बोलावून सांगितले नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी मिडीयाच्या माध्यमातून महिनाभर खेळच चालवला होता असे दिसते.दुसरीकडे महिणा उलटत नाही तर कॉंग्रेसने मिडीयात वेगळेच 4 जागांचे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. आम्ही वंचितला चार जागा दिल्या ? असा संभ्रम निर्माण करणे  म्हणजे वंचित ची केवळ कोंडी करून बदनामी करणे हाच उद्देश दिसतो.प्रत्यक्षात अकोला सोडून तीन जागा मिडीयाद्वारे अशा दिल्या की, महाविकास आघाडीतील पक्षांचे तिथे अस्तित्वातच नाही. म्हणजे पडणाऱ्या जागा देणार आणि वंचितचया भरवशावर उर्वरित मतदारसंघात वंचितचे 50 लाख मतं घेऊन महाविकास आघाडी निवडून येणार !! वरून 3-4 जागा म्हणून वंचितवर उपकार केल्याची भाषा करणार. "खाया पिया कुछ नही ..गिलास तोडा बारा आणा !" अशी गत वंचितची होणार.

●संजय राऊतांची अहंकारी मग्रुरीची -चिड आणणारी भाषा.

शिवसेनेसोबत बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली आहे. संपूर्ण विश्वास उध्दव ठाकरेंवर वेळोवेळी व्यक्त केला आहे. उध्दवजी आम्हाला महाविकास आघाडीत घेऊन जातील, आमच्या वतीने ते आघाडीतील इतर नेत्यांशी बोलतील. आम्हाला महाविकास आघाडीचा भाग.करून घेतले नाही तर आम्ही शिवसेनेच्या कोट्यातून जागा घेऊन लढू ! एवढी पारदर्शी व संयंमी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली होती. दुर्दैवाने उध्दव ठाकरे बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेला न्याय देऊ शकले नाहीत असेच दिसते.

बरं वंचित शिवसेनेचा मित्र पक्ष.संजय राऊतांचे भाषा आपल्या मित्राशी कशी पाहिजे होती ? मित्रत्वाची की, शत्रुत्वाची ? परंतु गेल्या सहा महिन्यातील वंचित संदर्भात केलेले वक्तव्य तपासले तर अत्यंत मग्रुरीची भाषा, गैरसमज पसरवणारे वक्तव्य, तुकडे फेकणारी भाषा !

त्यातल्या त्यात संतापजनक राऊत असे बोलतात की,जसे काही ते सुरुवातीपासून भाजपाचा विरोध करत आले. आणि पुरोगामी मतांवर ते (शिवसेना) निवडून आले. आणि त्यांच्या मते बाळासाहेब आंबेडकर म्हणजे राजकारण न समजणारे नेते.म्हणजे इतरांना दुधखुळे समजणे आणि स्वतः ला ग्रेट कुटील राजकारणी समजतात ? काय कोटी करणखरी राऊतांची नासमज भाषा ? काय तर म्हणे,” प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. बाबासाहेबांनी संविधान निर्माण केले आहे. प्रकाश आंबेडकर हे संविधान विरोधी भाजपाला मदत होईल असे काहीही करणार नाहीत ? “

या राऊताला ” जनाची तर मनाची काही लाज वाटते की नाही ?” गेल्या 44 वर्षात भाजपाचा आणि 2014 पासून मोदीशांच्या धोरणांचा छातीठोकपणे विरोध करणे आणि आरेसेसला शिंगावर घेणारे एकमेव बाळासाहेब आंबेडकरच आहेत. ” 25 वर्षे ज्यांनी भाजपसोबत सत्तेचा बिछाना गरम करत मस्तीत राहिले ते भाजप विरोधात कसे वागावे म्हणून बाळासाहेबांना शिकवणार ? नैतिकतेच्या गप्पा मारणार ?” बरं संजय राऊतला साथ द्यायला कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे आहेतच. यांना तर बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत नकोच आहेत !

● अहंकारी MVA मधील नेत्यांच्या धोरणाला कंटाळून बाळासाहेब आंबेडकरांचे थेट कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र.

शिवसेना उबाठा गट व राष्ट्रवादी शप गट यांच्या नकारात्मक धोरणातुन काहीच निष्पन्न होत नसल्याचे दिसून आल्याने बाळासाहेब आंबेडकरांनी काल (दि.19 मार्च)थेट कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. आणि कॉंग्रेस पक्षाच्या 7 जागांवर बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज्य स्तरावरील नेत्यांकडून युती संदर्भात कोणत्याही प्रकारचे सकारात्मक निर्णय होत नसल्याने शेवटी हायकमांडनेच यात हस्तक्षेप करून दिलेल्या प्रस्तावाचा स्विकार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याबदल्यात वंचितला जागा द्या किंवा पाठिंबा द्या अशी कोणतीही मागणी केली नाही हे विशेष !!

मागील 2019 च्या निवडणुकीत 7 जागा वंचित मुळे पडल्याचा खोडसाळ आरोप कॉंग्रेसने केला होता. तसे यावेळी होऊ नये म्हणून अतिशय सामंजस्याने कॉंग्रेसला महाविकास आघाडीकडून मिळालेल्या एकुण जागांपैकी कोणत्याही 7 जागा.सुचवून त्यां उमेदवाराना पुर्ण समर्थन व ग्राऊंडलेवलवर प्रचार आणि निवडून आणण्यासाठी मेहनत घेण्याचा प्रस्ताव  श्री मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेब आंबेडकरांनी पत्राद्वारे दिला आहे.

●महायुतीचा मुकाबला वजाबाकीच्या राजकारणाने महाविकास आघाडी करणार आहे का ?

भाजप मोदीशाने अबकी बार 400 पारचे उद्दिष्ट ठेऊन लहान सहान प्रादेशिक पक्ष, संघटना, नेते यांना एकत्र करत बेरजेचे धोरण राबवत आहे. प्रसंगी स्वतः जागा कमी घेऊन जोडलेल्या मित्र पक्षांना जागांचा वाटा देण्यास संकोच करत नाही. मात्र महाविकास आघाडीतील.नेते एवढे मग्रुर आणि अहंकारीपणे वागत आहेत की, प्रचंड जनाधार असलेल्या , प्रत्येक मतदारसंघात दोन, अडिच, तीन लाख मते असलेल्या वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांना जागा देत नाहीत. त्यांचा सन्मान करत नाहीत.srs

एकीकडे फुटलेला राष्ट्रवादी पक्ष 90% अजित पवारांकडे गेला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जिल्हा कार्यकारीण्या सुध्दा काही जिल्ह्यात अजित पवारांनी शिल्लक ठेवल्या नाहीत.पवारांच्या जवळचे सगळे नेते अजित पवारांकडे निघून गेले. आमदार गेले, खासदार गेले. तरी सुद्धा् महाविकास आघाडीत उरलेल्या शरद पवार गटाची जागा वाटपातील ताठरता आणि वंचित कडे पहाण्याचा दृष्टिकोन पुर्वीप्रमाणेच दिसून येतो. शिवसेना उबाठा गटिची तीच परिस्थिती आहे.40 आमदार फुटून शिंदे गटात गेले.खासदार सोडून गेले.पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गेले. तरी सुद्धा हेकडी जात नाही. मित्रत्वाचा हात देणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांना जवळचा / फायद्याचा वाटत नाही. राज्यातील कॉंग्रेस पक्ष व नेत्यांचे तर विचारूच नका. एकेक करून नेते इडिच्या धाकाने व काही सत्तेच्या मोहापायी भाजपात जात आहेत. गेले आहेत, काही मार्गात आहेत. कॉंग्रेसचा जनाधार संपलेला आहे. तरी सुद्धा युतीत ते बाळासाहेब आंबेडकरांना घ्यायला तयार नाहीत. कशी निवडून येईल महाविकास आघाडी ? आपल्याच माज- मग्रुरी आणि अहंकारापायी महाविकास आघाडी अपयशी होणार आणि त्याचा दोष बाळासाहेबांवर मढवणार ? हे कसे चालेल ?srs त्यामुळे MVA आताच सुधरा.वेळ अजूनही गेलेली नाही.
सुरेश रा शिरसाट, अकोला

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!