नैतिक मूल्यावर माणूस, कुटुंब, समाज, देश व जगाचे संचालन व्हावे, बौद्ध व मातंग एकजीव झाल्यास सत्तेची नाडी आपल्या हाती – प्रबुद्ध साठे.


मुंबई नायगाव:– मानवी जगाचे कल्याण व्हायचे असेल तर नैतिक मूल्यांवर आधारित माणूस, कुटुंब, समाज, देश व जगाचे संचलन व्हावे,, तसेच जातीव्यवस्थेने ज्यांना अधिक छळले ते पूर्वाश्रमीचे महार आताचे बौद्ध व मातंग समाज एकजीव झाल्यास सत्तेची नाडी आपल्या हाती येईल असे प्रतिपादन भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांनी केले, ते मुंबई दादर नायगाव जुनी बीडीडी चाळ पंचशील बुध्द विहार येथे अंकुर बुध्द विहार नायगाव आयोजित धम्म प्रवचन कार्यक्रम मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते, बौद्ध धम्म मानवतावादी तत्त्वज्ञान आहे,, बौद्ध होणे म्हणजे स्वतः मधील माणूस विकसित करणे, मन, बुध्दीचा विकास करणे, एक दिवस मानवी जगाला आपल्या सुखी आनंदी समाधान, परिवर्तनशील जीवनासाठी बुध्दालाच वाट विचारावी लागेल, देव धर्म जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणे म्हणजे बौद्ध होणे होय,, जातीच्या मानसिकता नष्ट करून बौद्ध व मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनवा त्यातून बहुजनांना योग्य नेतृत्व मिळेल असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, यावेळी माजी अतिरिक्त न्यायाधीश सोनवणे साहेब, आंबेडकर घराण्याचे व्याही पांडुरंग साळवी साहेब, धम्म प्रचारक त्रिभुवन गुरुजी, बी आय टी चाळ क्रमांक 1 रुम 50,51 जिथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांनी वास्तव्य केले, त्या ऐतिहासिक जागेचे सर्वधन करणारे शंकर लोखंडे साहेब, अध्यक्ष संतोष जाधव कार्यक्रम चे अध्यक्ष ज्योतीताई तांबे, विजय सावंत साहेब, आदी मान्यवर उपस्थित होते,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत