अनंत हेगडे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा खरा जातीवादी चेहरा आणि संविधानाविरोधी विचारधारा..

भाजपा खासदार, हिंदू राष्ट्राचे कट्टर समर्थक, राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे प्रचारक आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी खळबळजनक विधान केलेले आहे. भारतीय जनता पक्षाचा खरात जातीवादी चेहरा आणि संविधानाविरोधी भूमिका लक्षात येण्यासाठी त्यांचे हे मत सर्वांनी गांभीर्यांन विचारात घेणे गरजेचे आहे.
पक्षात आणि केंद्र शासनात जबाबदार पदावर काम केलेले अनंत हेगडे म्हणाले की संविधान बदलण्यासाठी आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी 400 सांसद असणे गरजेचे आहे. त्यासाठीच ” अबकी बार .. 400 पार” करायचे आहे. राज्यसभेमध्ये आपले दोन तृतीयांश बहुमत अजून पर्यंत नाही आणि दोन तृतीयांशी बहुमत आल्यानंतर आपण हिंदू राष्ट्र घोषित करू शकतो किंवा संविधान बदलू शकतो.
संविधान संशोधन करायला आणि काँग्रेसने केलेल्या चुकीच्या गोष्टी बदलण्यासाठी आपल्याला दोन तृतीयांशी बहुमताची आवश्यकता आहे, 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये सत्ता येणे आवश्यक आहे.
हेगडे यांच्या या विधानावरती काँग्रेस संसद राहुल गांधी यांनी म्हटलं की मोदी आणि भाजपा यांचे शेवटचे लक्ष बाबासाहेबांच संविधान संपविणे आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती करून इथे असणाऱ्या अल्पसंख्यांक आणि स्थानिक लोकांना सत्तेतून नव्हे तर सन्मानपूर्वक जगण्यापासूनही वंचित ठेवणे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपा चा खरा चेहरा ओळखून त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत