महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशेतीविषयक
शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीसाठी निधी वितरणास राज्य शासनाची मंजुरी..

गारपीठ, अवकाळी पाऊस अशा संकटांनी त्रस्त असलेल्या बळीराजाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी, २४ कोटी ६७ लाख ३७ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे.
याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत