महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

केतकी बाई, काल्पनिक कथेतून बाहेर ये..

केतकी चितळे, मी तुझ्या भावना समजू शकतो. पण तु आमच्या बहुजनांच्या भावना समजून घेवू शकत नाहीस. तुझ्या भावना तुला वाटतात तशा अन्यायाचा विरोध करण्यासाठी नाहीएत. पण तुझ्या मतानुसार जर कोणी एट्रोसिटीचा गैरफायदा घेत असेल तर त्याचे समर्थन कोणताही बहुजन करणार नाही. तु जे काही ‘एट्रोसिटीचे रॅकेट’ ही काल्पनिक कथा सांगत आहेस त्यातील कोणत्याही पात्रांची नावे तू सांगत नाहीस.तो कोणता वकील होता?कोणता साक्षीदार प्रत्येक केस मध्ये होता तेही तू स्पष्ट बोलली नाहीस. तुही तुझ्या पुर्वजाप्रमाणे काल्पनिक कथा रचत नाहीस ना?मला तर तू अन्यायाच्या विरोधात कमी पण एट्रोसिटीच्या विरोधात जास्त आहेस असं वाटायला लागलंय.लक्षात ठेव एट्रोसिटी कायदा सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी निर्माण केला गेलाय.हा कायदा म्हणजे अनुसुचित जातिच्या लोकांची कवच कुंडले आहेत. ती नसताना तुझ्या जातभाईनी पेशवाईत बहुजनांचे काय हाल हाल केले होते ते मी तुला सांगायला नको. तुझ्या जातभाईनी स्थापित केलेल्या जातिव्यवस्थेत अस्पृश्य जातींना पाण्याच्या घोटासाठी तडफडत मरावे लागले होते.देव आणि धर्माच्या नावावर तुझ्या जातभाईनी अस्पृश्यता निर्माण करुन बहुजनांचे जे हाल केले ना, त्यातून तुम्ही किती क्रृर वागलात ते माहित आहे का?आता ‍चुकुन तुम्हाला स्वताचे प्रतिबिंम दिसले तर त्रास होत आहे का?
केतकी तु ज्या ‘ब्राह्मणांसाठी अकलेच तारे तोडत आहेस. त्याच तुझ्या जातभाईनी धर्मात महिलांना कोणते स्थान दिले होते?तुझ्या जातभाईनी देवाच्या नावावर धर्माची जी उत्पत्ती केली त्यात ते प्रजापतीच्या तोंडातुन जन्मले असे दाखवले आहे. पण तू कुठून जन्मलीस?तुझा अर्थात ब्राह्मण महिलांचा जन्म किंवा कुठल्याही महिलांचा जन्म धर्मशास्त्रात दाखवला गेला नाही.तरीही सर्वच स्त्रियांना धर्म शास्त्राने शुद्रांपेक्षा हिन मानले आहे. स्रीही उपभोगाची वस्तू आहे असे ज्या लोकांनी धर्म शास्त्रात मांडलय त्या ब्राह्मण समाजाविषयी अभिमान बाळगून तु तुझं बेताल वक्तव्य करतेस ते योग्य नाही. ज्या पर्शुरामाचा तु अभिमान बाळगतेस ना,विसरू नकोस तो स्वतःच्या आईचा हत्यारा आहे. त्याने जर 21वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली असेल तर तो क्रुरकर्मा होता. कित्येक निरपराधांना मारणाऱ्या परशुरामाचा तुम्ही अभिमान बाळगत असाल तर तुमच्यासारखे नीच कोणी नाही.केतकी हे ब्राह्मण तुझी कधी काशिबाई करतील ते तुलाही कळणार नाही. कित्येक विधवा स्रियांना ज्यांनी देव आणि धर्माच्या नावावर जीवंत जाळले होते. आज त्याच ब्राह्मण जातीचा अभिमान बाळगते आहेस तु? थू तुझ्या जिंदगाणीवर.

✍️संतोष मधुकर पाटणकर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!