महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

यशवंतराव चव्हाण यांनी भारतरत्न द्यावा. – राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकसभेत मागणी

सातारा : देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदान लक्षात घेवून यशवंतराव चव्हाण यांना १२ मार्च रोजी त्यांच्या १११ व्या जयंतीच्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी दिली.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कदम म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा आहेत. त्यांच्या विचाराचे वारसदार अनेक राजकीय पक्षात सामाजिक, राजकीय जवाबदारीने काम करीत आहेत. त्यांच्यासारख्या बहुजन समाजाचे हित जोपासणाऱ्या महान नेत्याचा गौरव व्हावा, अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व वैचारिक वारसदारांना एकत्रित करून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्काराबाबत सामूहिक प्रयत्न करून करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!