मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भाजपा, मोदी, शहा यांना हरवलचं पाहिजे कारण यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे.. ! – ॲड. असीम सरोदे

असंवैधानिक शक्तींना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी प्रामाणिक राजकीय व्यूहरचना झालीच पाहिजे.

धाराशिव : रविवार दिनांक 3-2-2024 रोजीच्या येथील कार्यक्रमास संविधान अभ्यासक ॲड असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी, उत्पल चंदावर, बाळकृष्ण निढाळकर, ॲड श्रेया आवले यांची विशेष उपस्थिती होती. लोकशाही विचारपिठ धाराशिव तर्फे आयोजित या कार्यक्रमास राजकारण्यांच्या भुल थापा, जतिद्वेश याचा कंटाळा आलेल्या हजारो लोकांच्या उपस्थितीने सभेचे मैदान भरगच्च भरले होते..

५० च्या वर सभा घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्न करताना करोडो जनता ही निर्भय बनून मतदानाला सज्ज आहे याचा अभिमान असल्याचे सांगितले.

ऍड. असीम सरोदे यांनी पत्रकारांसाठी गृहपाठ दिला. गुवाहाटी येथे कोणत्या दोन आमदारांना बेदम मारहाण करण्यात आली याची माहिती काढावी असे आवाहन केले.

बहुजनांची सत्ता यावी यासाठी सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. लोकशाहीवर सांविधनावर होणारे हल्ले खपवून घेतले जाऊ नये असं तळमळीच आवाहन यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आले.

द्वेषमुक्त समाज आणि माणुसकीसाठी, दडपशाहीच्या विरोधात,लोकशाही रक्षणासाठी.. निर्भय बनो !! असा संदेश या कार्यक्रमातून जनमानसात पोहोचला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!