महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराजसामाजिक / सांस्कृतिक

संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज लेख शृंखला – 1

प्रिय बंधूंनो …!

रविदास वाणी मानव मुक्तीची गाथा
नमीतो सदा गुरू पुढे हा विनम्र माथा.

साधु संत महात्मे मूर्तीसमोर माथा टेकवत नसतात.ते विचारासमोर नतमस्तक असतात. मुर्ती प्रतिक असते.विचार हे अनुभुतीचे असतात. मुर्ती दिसते पण विचार दिसत नसतात. कारण ते मन आणि बुद्धीच्या जीवीच्या जिव्हाळ्याचे साकार रूप असतात. जीव म्हणजे प्राणी.जिवाला जिव्हाळ्याचा नैसर्गिक लळा असतो. गुरू रविदाची “अमृत वाणी” जिवाला लागलाला लळा आहे. लळा मानवतेच्या निर्मळ झरयातून झिरपलेला असतो.. ! संत ज्ञानेश्वर माऊलीचे “पसायदान “हे अमृतझिरा आहे. 13 व्या शतकात 16 व्या वर्षात “ज्ञानेश्वरी” ग्रंथराज लिहून झाल्यावर ज्ञानेश्वरांने गुरू निवृत्तीनाथाला प्रसादासाठी मागितलेले साकडेआहे… !
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे,तोषोनि मज द्यावे पसायदान हे!
जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो,भुता परस्परे पडो मैत्र जीवाचे ..
दुरितांचे तिमीर जावो विश्वस्वधर्म सुर्य पाहो.जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात !!
वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मंदीयाळी अनवरत भूमंडळी भेट तु या भुता!!
चला कलपतरूंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव ,बोलते जे अर्णव पीयुषाचे !!
.वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मंदियाळी…..
तेथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो,येणेवर ज्ञानदेवो सुखिया झाला!! अर्थ सर्व श्रुत आहे. ज्ञानदेवाचे पसायदान आणि.संत रविदासाच्या बेगमपुर दोह्याचे काव्यात्मक साध्यर्म आहे.
रविदास महाराजांना तत्कालीन राजे,महाराजे,सरदार, बादशहा जे त्यांचे शिष्य झाले होते. त्या शिष्यांनी गुरूप्रसाद म्हणून आम्हांला काहीतरी मागा अशी विनवणी केल्यावर तख्त,खजाना,वा मठा,पिठाची मला लालसा नाही . ऐसा चाहू राज मै जहा मिले सबनको अन्न ,छोट बडो सब रहै सम रैदास रहै प्रसन्न !! असे तुम्हाला मला जर काही देयचंच असेल तर बेगमपूर द्या .
बेगमपुरा सहर कौ नाउ, दुखू अंदोहू नही तिही ठांउ!
नां तसवीस खिराजू न मालू ,खउपु न खता न तरसु जवालु!
अफ मोहि खूब वतन गह पाई ,ऊहां खैरी सदा मेरे भाई!!
काइमु दायमु सदा पातिसाही ,दोम न सेम सेम एक सो आही.
आबादानु सदा मसहूर ,ऊहां गनी बसहि मामूर !!
तिउ तिऊ सैल करहि जिऊ भावै महरम महल न कौ अटकावे !
कहि रविदास खलास चमारा जो हम सहरी सू मीतू हमारा !!
बेगमपुर म्हणजे गम नसणारे बे गम ..! ( city without sorrow) पूर चा अल्प अर्थ शहर, आणि व्यापक अर्थ समाज, देश, विश्व .! बेगमपुर म्हणजे असे नगर की (असा समाज असा देश कि) जिथे कसलीच कुणालाच चिंता नाही , मानसिक दु:ख ,भिती, शारिरीक चिंता, छळ कपट नाही .कसले ही कर नाहीत (तत्कालीन झिझियामुळे गरीबांना धर्मांतरे करावी लागत,) असले झंझटच नाही.कोणी गरीब, श्रीमंत नाही.राजा आणि रंक एकच. वर्ण नाही, वर्ग नाही आणि फुकट खाऊ ही नाही.सर्वत्र मुलभूत एकता ,समानता (classless,castless society) समता मुलक आनंदराज असावे . जिथे सर्वजण एकोप्याने अलौकिक सुख भोगत आहेत.असे राज्य द्या. म्हणजेच “ऐसा चाहू राज मै….हेच पसायदान संत रविदासानी १४ व्या शतकात “बेगमपुरा सहर कौ मै नाऊ” या काव्यात मांडले आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा अनंत प्रकारे छळ झाला पण त्यानी खल म्हणजे खलनायकांचा नायनाट व्हावो असै म्हटले नाही तर ,ते सज्जन व्हावोत सत्कर्मी व्हावोत आणि सर्व प्राणी मात्रासी मित्रता, करूणा,अद्वेष्टा प्रेम करोत असे विश्वकल्याणी मागणे घातले आहे.चर्मकार रविदास काशीत पंडीत धर्मभास्करां बरोबर पंडीत मौलवी मुल्लाबरोर वेद ,धर्मतत्वे
शास्त्रं, पुराणांवर आणि कुराणावर तर्कशुद्ध प्रतिकाराने निर्भीडपणे खंडन मनन करून मानवतावाद सांगतात.जनसामान्यांच्या मनात अदभूत चैतन्य निर्माण करतात.
ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणेच भुता परस्पर पडो मैत्र जीवाचे असे सहजीवनाचे धर्मातीत विचार सागत असतानाच मस्जिद सो कुछ घीन नही मंदीर सो नही प्यार ! दोऊ अल्ला हरी नही कह रविदास उचार !! असे धर्मातीत देवातित आणि सर्वधर्मीय आपापले विश्वस्वधर्मसुर्ये पाहो असे चिंततात.तेव्हा त्यांनाही माऊलीसारखेच प्रचंड विरोध व छळास सामोरे जावे लागले होते…! “बेगमपुरा “जीवनसुत्र व “पसायदान”दोन्ही एकच आहे. संत महात्यांचा आत्मा एकच असतो.याचे हे उदाहरण आहे . निरागस कुमार ज्ञानाचा राजा अश्या कल्पतरुच्या चालत्या उद्यानाला “चिंतामणी” गाव म्हणतात तर रविदासजी “बेगमपुर” म्हणतात. माऊलींच्या “दुरितांचे तिमीर जावो “ला रविदासजी सर्व धर्म सम भावाचा सुर्य उगवून मंगलप्रकाश यावा असे चिंततात.” शेवटी “येणेवर ज्ञानदेवो सुखिया झाला “म्हणतात तर रविदासजी” रविदास रहे प्रसन्न” म्हणतात.एका माऊलीने ज्ञान याग करविला तर दुसरया गुरूमाऊलीने आपल्या जगण्यालाच धगधगता यज्ञ केला आणि शिष्यांना अंधविश्वास, कर्मकांड,विषमतेची आहुती द्यायला भाग पाडले..! ज्ञान व भक्तीचे पृथ्थःकरण करून ऐसा चाहू राज मै चे पसायदान शुद्ध निरागस मनाने मागणे हे विश्वकल्याणाचे मागणे ठरते.हे पसायदान ते मूर्तीसमोर मागत नाहीत तर ते हाती सत्ता असलेल्यां सत्कार्यी ईश्वर निष्ठांची मंदीयाळी हिंदू आणि मुस्लीम शिष्यांना जे ह्या दुनियेचे गनी आहेत .त्यांना गुरूदक्षिणेचा प्रसाद मागत आहेत. गुरू रविदासाना ‘दिव्य आत्मभान’ झाले होते.त्या आत्मभानातून त्यांना आंतरगतीची जाणीव झाली होती कि, हे विश्व अनंत अनंत क्षमताना अमूर्त स्वरूपात धारण करून आहे..! “बेगमपुरा” हा ह्या केवलज्ञानाचा ईश्वरीय अविष्कार आहे.बेगमपुर म्हणजे व्यापक अर्थाने पृथ्वी .अनंत ब्रम्हांडात ही पृथ्वी एक बिंदू आहे.. हया बिंदूला ‘वसुधैव ‘ बेगमपूर बनवणारे दोहे निर्गुण ब्रम्हांड निर्मिकाचे सगुण भाव आहेत जे ज्ञान प्राप्तीचे विज्ञान आहे…! मानवाच्या सुप्त जाणीवा जागृत करण्याचे शून्याचा शोध लागलेल्या संशोधनाप्रमाणे नेणीवा आहेत…!

जय रविदास..!
लेखक- अँड. आनंद गवळी.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!