बुलडाणा, नंदुरबार, हिंगोलीत जवळपास ७०० जणांना “आमटी भगर” च्या प्रसादातून विषबाधा..

राज्यात बुलडाणा, नंदुरबार, हिंगोली या तीन जिल्ह्यात जवळपास सातशे जणांना धार्मिक कार्यक्रमा मध्ये भगर, भाकर आणि आमटी चा प्रसाद खाऊन विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांची प्रकृती आता सुधारल्याचं त्या त्या जिल्ह्यातल्या आरोग्य प्रशासनानं सांगितलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात सोमठाणा, खापरखेड इथं तीनशेहून अधिकजणांना विषबाधा झाली आहे. यात एकूण १०० जणांवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नंदुरबार तालुक्यात रणाळे इथं भंडाऱ्याच्या प्रसादातून अडीचशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर दीडशेहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य प्रशासनानं सांगितलं.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात रेणापूर इथंही काल भगरीच्या प्रसादातून जवळपास दीडशे जणांना विषबाधा झाली. मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ सुरू झाल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आज आणखी ३० जण तीच लक्षणं दिसल्यानंतर रूग्णालयात आले.
बऱ्याच ठिकाणी बेड ची कमतरता भासत असून आरोग्य यंत्रणे कडून आहे त्या ठिकाणी औषधउपचार दिले जात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत