दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

डॉ आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती महोत्सव साजरा

( राहुल हंडोरे यांजकडून )
अंबरनाथ दि. 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवार हाती घेऊन रयतेसाठी लढा देऊन स्वराज्य स्थापन केले, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्ष वंचित असलेले दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांच्या न्याय हक्कासाठी संविधानाची निर्मिती केली असे उदगार आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ पूर्वेला नवरेनगर विभागात आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना काढले. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा नयनाताई ठाकरे होत्या.

डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान व महिला प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने अंबरनाथ पूर्वेला नवरेनगर विभागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी आमदार डॉ बालाजी किणीकर हे बोलत होते. कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका बाबत आपण सामाजिक न्याय मंत्री, महिला बाल विकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे आश्वासन आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी या प्रसंगी दिले. सूत्रसंचालन डॉ आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी केले.

सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी सुधाकर सरवदे आपल्या प्रास्तविक भाषणात म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आठरापगड बारा बलुतेदार समाजाच्या लोकांच्या हाती तलवार दिली. जो लढतो तो क्षत्रिय हा विचार अमलात आणून जातीयतेला मूठमाती दिली. भटक्या विमुक्त समाजाचे नेते, मंत्रालयातीला माजी उपसचिव कैलास भंडाळकर म्हणाले की, बौध्द समाजाने मोठा भाऊ म्हणून भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे तसेच आम्हाला सुद्धा आंबेडकरी चळवळीत बरोबर घेतले पाहिजे असे ही भंडाळकर म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नयनाताई ठाकरे अध्यक्षीय म्हणाल्या की, कुणाचा कुठलाही झेंडा असुद्या झेंड्याचा दांडा मात्र आपल्या एकाच विचाराचा असला पाहिजे.

कार्यक्रमात युवा उद्योजक विश्वजित करंजुले, युवा उद्योजक निखिल चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांचा आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच डॉ स्नेहल कांबळे यांचा आमदार डॉ बालाजी किणीकर आणि महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सभेत बंजारा समाजाच्या अध्यक्षा चंद्रकला जाधव, ग्रामीण साहित्यिक कवी लक्ष्मण अभंगे यांची भाषणे झाली. मंत्रालयातील माजी सह सचिव, सुप्रसिद्ध गायक आय एम मोरे यांनी संविधानावर आधारित गीत सादर केले. तर कवी गायक प्रा. डॉ. अरुण अहिरराव यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जिवन चरित्र्यावर आधारित गीत गायिले. बाल कलाकार स्वरांश हंडोरे याने मिले सुर तुम्हारा हमारा हे बहू भाषेतील गीत सादर केले. या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते दादासाहेब देठे, विनायक सोसायटीचे अध्यक्ष काकासाहेब कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे महिला साठी कार्यरत आसलेल्या महिला प्रतिष्ठानची मध्यवर्ती कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षा कुसुम गौतम, कार्याध्यक्षा पुष्पा पवार, सचिव करुणा कातखडे, कोषाध्यक्षा नलिनी हंडोरे, उपाध्यक्षा अलका साळवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच कार्यकारणी प्रभारी म्हणून वनिता गंभीर (उल्हासनगर ), कल्पना मधाळे (अंबरनाथ ), अनिता रणदिवे (बदलापूर ) यांची नावे जाहीर करण्यात आली. शेवटी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सभेच्या कार्यक्रमा नंतर विनायक, रिद्धी, सिद्धी सोसायटी मधील लहान मुलींनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची वहावा मिळविली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!