मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? पाण्याचे तापमान किती असावे?

1) अंघोळ करण्याची योग्य वेळआयुर्वेदानुसार, सूर्योदयापूर्वी उठणे, शौचास जाणे आणि दात घासल्यानंतर लगेच अंघोळ करावी. पण, काही जण घाईगडबडीत किंवा आळशीपणा करत अंघोळ करतात. तर काही लोक दिवसभर अंघोळही करत नाहीत. यात सूर्यास्ताच्या वेळी शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ केली पाहिजे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटून रात्री शांत झोप येण्यास मदत होते.

२) पाण्याचे योग्य तापमान आणि प्रमाणआयुर्वेदानुसार, अंघोळीसाठी थंड किंवा कोमट पाणी वापरणे फायदेशीर आहे. काहींना खूप गरम पाण्यानेही अंघोळ करणे आवडते. परंतु, ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशाने शरीरात कोरडेपणा वाढतो. गरम पाणी केसांसाठीही आणखी हानिकारक आहे. त्यामुळे केस खडबडीत होऊन जास्त प्रमाणात तुटणे सुरू होते.आयुर्वेदानुसार, व्यक्तीने हत्तीसारखी अंघोळ केली पाहिजे. याचा अर्थ असा की, आपण स्वत:ला स्वच्छ करण्यासाठी पुरेश्या पाण्याचा वापर केला पाहिजे.

३) अंघोळीपूर्वी तेलाने मालिश कराआयुर्वेदात अंघोळीपूर्वी शरीराला तेलाने मालिश करणे अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि स्नायूंचे क्रॅम्पही दूर होतात. त्यामुळे अंघोळ करण्यापूर्वी मोहरी, नारळ, तीळ किंवा बदामाच्या तेलाने शरीराला वरपासून खालपर्यंत मसाज करा. साधारण अर्धा तास असेच ठेवा आणि नंतर अंघोळ करा.

४) शरीर स्वतःच कोरडे होऊ द्याअंघोळीनंतर अंगाला टॉवेलने घासून कोरडे करणे अजिबात योग्य नाही, अंघोळीनंतर शरीर दोन मिनिटे असेच राहू द्या. पाणी आपोआप सुकते. टॉवेलने घासल्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि काही वेळा टॉवेल वेळोवेळी न धुतल्याने त्वचेचे नुकसान होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!