प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

अक्कलकोट मधील बौद्धांचा आक्रोश मोर्चा यशस्वी झाला,,, पुढे काय..?

–रघुनाथराव गायकवाड, सोलापूर.

———————————————————————-=

दि.5 फेब्रुवारी 2024 या दिवशी अक्कलकोट शहरात बौद्ध बांधवांचा, भीम सैनिकांचा प्रचंड अश्या संख्येने ” आक्रोश ” मोर्चा यशस्वीरित्या पार पडला,, यशस्वीचे दोन परिमाण असतात एक संख्यात्मक आणि दुसरे गुणात्मक आणि मला नमूद करण्यात गर्व वाटतो कि हा मोर्चा दोन्हीप्रकारे यशस्वी झाला यात वाद नाही. अर्थात यामागे अक्कलकोट मधील भीम नगर या बौद्ध वसाहतीमधील बौद्धाच्या घरात बेरात्री घुसून पोलीस प्राशासनाने जो अनन्वित अत्याचार केला होता त्याची एक काळीकुट्ट किनार होती.. आणि हा जुलमी अत्याचाराचा प्रसंग भीम नगर वासियाचा जिव्हारी लागला,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि, गुलामाला गुलामीची जाणीव करून मग तो बंड करून उठेल आणि नेमके इथे तेच घडले इथला अबालवृद्ध ही जाणीव झाल्याने तो पेटून उठला, ते एकटेच पेटून उठले नाहीत तर ही धगधगती मशाल इथल्या नेतृत्वाने अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील बौद्ध वस्त्यामधून फिरवली आणि त्याची धग पार पुण्या मुंबई पर्यंत येऊन धडकली,,, ही भूमिका अक्कलकोट तालुक्याच्या स्तरावर नेतृत्व करणारे आयु. चंद्रशेखरजी मडीखांबे, आयु. उत्तमजी गायकवाड, आयु. शिलमणी बनसोडे व त्यांचे अनेक सहकारी अहोरात्र कष्ट घेतले त्याचे हे दृश्य स्वरूपातील रिझल्ट होते…या घटनेला आणखी तीन घटनाची जोड देण्यात आली, ती म्हणजे तालुक्यातील नागणसूर येथील भीम जयंतीची व दुसरी घोळसगाव येथील एका जत्रेच्या प्रसंगी जातीवादी व्यक्तीकडून महार ( अर्थात बौद्ध ) या समुदाय बाबत अतिशय गलिच्छ शब्दात केलेले वर्णन.आणि तिसरी म्हणजे गुलबर्गा जिल्ह्यातील कोतनूर या ठिकाणी झालेली आमची अस्मिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना…

मित्रानो, या सर्व प्रकरणाने भीम सैनिक पेटूनू उठला नाही तरच नवल… आणि अपेक्षेप्रमाणे भीम सैनिकांचा उद्रेक झाला,, आणि अतिशय प्रचंड संख्येने, ताकदीने तो प्रशासनाचे विरोधात तो अक्कलकोट शहरात येऊन धडकला,,मोर्चा समारोप प्रसंगी अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची, अभ्यासकांची, हितचिंतक, व शाळकरी मुलींची यथोचित भाषणे झाली… मित्रानो,, या संपूर्ण मोर्चा प्रसंगी मी केवळ एक भीम सैनिक नव्हे तर एक निरीक्षक या भूमिकेतून मी माझा सहभाग नोंदविला म्हणून माझं हे निरीक्षण याठिकाणी तटस्थपणे नोंदवित आहे…

विचारपीठावरील आपली मते व्यक्त करण्याऱ्या वक्त्यांच्या भाषणात कांही सन्माननीय वक्ते सोडल्यास अक्राळेस्तळपणा जास्त भरभरून वाहत होता, अर्थात हे गर्दीचे मानसशास्त्र असते,, समोरील समुदयावर अरुढ होण्याकरिता आक्रमक आवेश घेऊन कांही शेलक्या शब्दांचा वापर करावा लागतो, सवंग भाषा शैलीचा मुक्त वापर करावा लागतो,,, आणि यात कांही वक्ते फार खुबीने यशस्वी झाले…. आणि तहसीलदार, पोलीस प्रशासनाकडे उचित निवेदन देऊन, मोर्चाचा सांगता झाली….

मित्रानो अशाप्रकारे आपण यशस्वी झालो,,, आणि वर नमूद केल्या नुसार मी निरीक्षकाच्या भिमीकेत सहभाग नोंदविल्याने कांही प्रश्न मी समाजापुढे प्रस्तावीत करीत आहे,, कारण हे प्रश्न माझ्या स्वअनूभावनातून निर्माण झाले आहेत…आपल्या चळवळीची पुढील दिशा काय? या चिंतनातून आलेले आहेत.
1) आपला लढा हा सर्वस्वी मनुवाद्या विरोधातील, जातीवाद्या विरोधातील लढा आहे.. संविधान नष्ट करू पाहणाऱ्या शक्ती विरोधातील लढा आहे मग हा लढा त्याच शक्तिसोबत जाऊन कसा लढता येईल,? येत्या 2024 च्या निवडणूकीमध्ये आपली भीम शक्ती कश्या प्रकारे युटीलाईज करणार,,?मनुवाद्याचा पराभव करण्याकरिता काय रणनीती अखणार,, व ती रणनिती फलद्रूप यामध्ये समन्वयं व नियंत्रण कुणाचे असणार? मताचे ध्रुवीकारण टाळण्याकरिता कोणत्याच नेत्याकडे अजेंडा नाही, असल्यास ते समाजा पुढे मांडण्यात यावे…

2 ) गुलबर्गा येथील डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण,, आणि घोळसगाव प्रकरणी आंबेडकरवादी वकील लोकांची फौज कार्यान्वइत करावी….

3) नागणसूर येथील भीम जयंती बाबत ऍट्रॉ्सिटी अंतर्गत संबंधिता वर कडक कारवाई करण्यात यावी कायदाचा बडगा हा एकमेव सनदशील मार्ग होय,, त्यासाठी त्या गावात जाऊन शक्ती प्रदर्शन करणे हे तात्पुरते आणि टाकलादू ठरेल,,, शिवाय त्याचे दूरगामी परिणाम तेथल्या बौद्ध कुटुंबाना भोगावे लागतील सबब हा नाजूक विषय, संवेदनशील विषय हळुवारपणे हाताळावे लागेल,, आणि हे भीम अनुयायांना अवघड अजिबात नाही…

4 )अक्कलकोट आक्रोश मोर्चा नंतर कांही कार्यकर्त्यांच्या मनात राजकीय आकांक्षाला धुमारे फुटताना दिसत आहे,,, आम्ही नव्वद हजारोच्या संख्येने आहोत अशी समीकरणे मांडली जात आहेत,, व त्यात गैर कांही नाही, जातीवाद्या सोबत लढणे इतके सोपे नाही,,आपण संसाधने यात कमी पडतो , मी याबत घाटकोपर येथील रमाबाई नगर हत्याकांडाचे उदाहरण देऊ इच्छितो कि,, एव्हढे भीषण हत्याकांड तिथे घडूनही त्या मतदार संघात अद्याप एकदाही आंबेडकरवादी उमेद्वार निवडून आला नाही,, जाणकाराने यावर विचार मंथन करतील काय?

5) पोलिसाने केलेल्या कोबिंग ऑपरेशन विरोधात जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही एकतेची मशाल कोणत्याही परिस्थितीत विझता कामा नये,, ही सर्वांची सामुदाईक जबाबदारी आहे,,, अन्यथा येत्या निवडणूकीत .गटा ताटाने गुपचूप वेगवेगळ्या पक्षांकडे जाऊन या धगधगत्या माशालिवर पाणी शिंपडण्याचे विकृत खेळी होता कामा नये.

.. मित्रानो,,, शेवटी जाता जाता एव्हढेच सांगेन कि दिवस अतिशय वाईट आहेत, येणार आहेत, समाज एकत्र राहणे ही काळाची गरज आहे,एकसंघ राहणे ही काळाची गरज आहे नव्हे आपल्या आक्रोश मोर्चाचे ते फलित ठरेल.

जय भीम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!