बौद्ध धम्म हा मानवी कल्याणाचा व बौद्ध संस्काराचा केंद्र बिंदू आहे :- सोनवणे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म आणि इतर धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास करून बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान श्रेष्ठ कसे आहे सांगून दिले त्यामुळे बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्माचे संस्कार हे लोक कल्याणकारी आहेत कारण
बौद्ध धम्म हा मानव विकास आणी संशोधन बौद्ध संस्काराचा केंद्र बिंदु ठरला आहे असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया [ आर्थात ] भारतीय भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य गुणवंत सोनवणे यांनी केले
नुकतीच धाराशिव स्मृती बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा बैकक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा विजयमालाताई धावरे ह्या होत्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषाध्यक्षा राजश्रीताई कदम यांनी केले यावेळी जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर , लोहारा आणि उमरगा या तालुक्यातून आलेल्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापला कार्य अहवाल जिल्हा कमिटी समोर सादर केला यामुळे भारतीय बौद्ध महासभेचा धाराशिव जिल्ह्याचा कार्य अहवालात खूप पारदर्शकता असल्याचे केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे यांनी नमूद केले . यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास पांडागळे जिल्हा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे , संस्कार विभागाचे सचिव कुमार ढेपे , हिशोब तपासणी देविदास कदम,बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे , धाराशिव तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , तुळजापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे , लोहारा तालुका अध्यक्ष तानाजी माटे , उस्मानाबाद तालुका सरचिटणीस उमाजी गायकवाड लोहारा कार्यालयीन सचिव स्वप्नील सोनवणे , समता सैनिक दल उपाध्यक्ष सचिन दीपक उस्मानाबाद तालुका संघटक बापू जावळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका कार्य कारिणीची आढावा बैठक संपन्न झाली . प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन या बैठकीला सुरुवात करण्यात आली या बैठकीमध्ये प्रत्येक संस्थेच्या प्रत्येक पदाधिकारी यांनी आपापले मते व्यक्त केली यामध्ये संस्कार शिबिर घेणे धम्म परिषदा लावणे महिला उपासक शिबिर घेणे . विवाह करार प्रमाणपत्र , विवाह प्रमाणपत्र बौद्ध आसल्याचा दाखला , धम्म दिक्षा प्रमाणपत्र , अनेक महत्त्वाच्या विषयावरती महत्त्व पुर्ण चर्चा करण्यात आली . सूत्रसंचालन कुमार ढेपे यानी केले तर शेवटी आभार बाळासाहेब बागडे यांनी मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत