घटना सभेत देशाला धर्म दिला असता तर ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले नसते
मा.अनिल वैद्य
कारंजा घाटगे जि वर्धा येथील नारा गावच्या बौद्ध विहार प्रांगणात आयोजित संविधान सभेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य हे अध्यक्ष होते त्यांनी धर्मांधता पसरविणाऱ्या सत्ता धरिय लोकांना उद्देशून सांगितले की,
ब्रिटिश धर्मनिरपेक्ष लोकशाही मानणारे होते.ब्रिटिशांनी आधी स्वातंत्र्य दिले नाही त्यांनी १९४६ ला भारतीयांना संविधान निर्माण करण्याचे सांगितले.त्या नुसार २९९ सद्यस्यांची संविधान सभा गठीत केली.९ डिसेंबर १९४६ला पहिली सभा झाली.त्यानंतर संविधान सभेत देशाच्या घटनेचे उद्देश मंजूर झाले.समता ,स्वातंत्र्य,बंधुत्व या सोबत धर्मनिरपेक्ष लोकशाही असा भारत राहील असे घटनेत धेय्य व उद्देश मंजूर झाले.हे सर्व १९४६ला स्वातंत्र्य देण्या पूर्वी झाले तेव्हा कुठे ब्रिटिशांनी १५ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य दिले.त्या नंतर ११९४८ ला ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माउंट बॅटन यांनी देश सोडला. लॉर्ड माऊटबॅटन हे स्वतंत्र भारताचे सुद्धा गव्हर्नर जनरल होते.
जर त्याच वेळी भारतीयांनी या देशाला हिंदू किंवा कोणताही धर्म राहील अशी तरतूद केली असती .तर ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले नसते.आणि आता या देशाला धर्म देण्याचा प्रयत्न होत आहे.ही बेइमानी आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत शेवटचे भाषणात म्हणाले की एखादा पक्ष संविधाना पेक्षा स्वतःच्या पक्षाचे तत्व मोठे समजत असेल तर हा देश पारतंत्र्यात जाईल.हा इशारा देशाने लक्षात घेतला पाहिजे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राजरत्न आंबेडकर होते.त्यांनी बौद्धांच्या आर्थिक विकासासाठी योजना आखण्याची गरज असल्याचेत्यांनी प्रतिपादन केले.त्यांनी विविध योजनाची माहिती दिली.ते बँक स्थापन करीत असून त्या साठी शेअर घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
देशातील असविधनिक बाबीवर
त्यांनी सडेतोड टीका केली.लोकशाही साठी आपण सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले.
या सभेचे मुख्य संयोजक प्रा विनोद बागडे व उद्योजक बाबाराव सोमकुवर होते.विचारपिठांवर दिनेश हनुमंते, हिंगणघाटचे शिक्षण महर्षी अनिल जवादे,भंते राजरत्न वर्धा हे होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत